लाखो तरुणांना रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. पण अनेकांचं हे स्वप्न पूर्ण होत नाही.
रेल्वेकडून वेळोवेळी भरती निघते. याअंतर्गत विविध पदे भरली जातात.
पण रेल्वेमध्ये कोणत्या प्रकारची भरती होते? तुम्हाला माहिती आहे का?
रेल्वे भरतीसाठी दरवर्षी स्टाफ सिलेक्शन भरतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाते.
यूपीएससी परीक्षा देऊन तुम्ही रेल्वेत उच्च पदावर नोकरी करु शकता.
यूपीएससी भरती अंतर्गत भारतीय रेल्वे अकाऊंट्स सर्व्हिस,रेल्वे पर्सनल सर्व्हिस आणि रेल्वे ट्रॅफीक सर्व्हिसची अधिकृत भरती होते.
रेल्वे भरतीमध्ये सर्वात जास्त पगार हा रेल्वे बोर्ड चेअरमनला मिळतो. पे लेव्हल 17 नुसार हा पगार 2 लाख 25 हजार रुपयांपर्यंत मिळतो.