सरकारच्या दोन वर्षपूर्तीच्या आनंदावर आचारसंहितेचे विरजण

राज्यातील भाजप प्रणीत सरकारच्या दोन वर्षपूर्तीच्या आनंदावर आगामी २१२ नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यामुळे विरजण पडलं आह. 

Updated: Oct 17, 2016, 05:13 PM IST
सरकारच्या दोन वर्षपूर्तीच्या आनंदावर आचारसंहितेचे विरजण title=

मुंबई : राज्यातील भाजप प्रणीत सरकारच्या दोन वर्षपूर्तीच्या आनंदावर आगामी २१२ नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यामुळे विरजण पडलं आह. 

आज नगरपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.  त्यामुळे राज्यातील बहुतांशी भागात आचारसंहिता लागू झाली, पण यामुळे राज्य सरकारच्या दोन वर्षांपूर्तीच्या जाहीरातीवर बंदी येणार आहे. 

सरकारने  गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध वृत्तपत्र आणि वाहिन्यांच्या माध्यमातून जाहिरातीचा धडका सुरू केला होता. आता या जाहिराती बंद कराव्या लागणार आहे.