अनुष्कासह विराट दक्षिण आफ्रिकेला रवाना...

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी क्रिकेट सीरीजपेक्षा लग्न करणे अधिक महत्त्वाचे होते.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 28, 2017, 12:17 PM IST
अनुष्कासह विराट दक्षिण आफ्रिकेला रवाना... title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी क्रिकेट सीरीजपेक्षा लग्न करणे अधिक महत्त्वाचे होते. तसेच माझ्या ३ आठवड़्याच्या ब्रेकचा परिणाम दक्षिण आफ्रिकेच्या आगामी दौऱ्यावऱ्याच्या तयारीवर होणार नाही. विराट श्रीलंकेविरूद्धच्या सिरीजमध्ये सहभागी होऊ शकला नाही. त्याने खास लग्नासाठी सुट्टी घेतली होती आणि इटलीतील टस्कनीमध्ये तो बॉलिवूड अभिनेत्री अनुष्कासोबत विवाहबद्ध झाला.

तीन टेस्ट मॅचची सिरीज

लग्नाचे सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर बुधवारी रात्री तो भारतीय टीमसोबत दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला. तिथे तीन टेस्ट मॅचची सिरीज ५ जानेवारीपासून सुरू होईल.

vira

virat

 

मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तयार

लग्नाच्या सुट्टीनंतर पुन्हा क्रिकेटकडे वळणे किती कठीण होते, असे विचाताच विराट म्हणाला, काहीच कठीण नाही. मी लग्नासाठी बाहेर होतो. कारण तेव्हा ते महत्त्वाचे होते. ती वेळ आमच्या दोघांसाठी खास होती.
पुढे तो म्हणाला, क्रिकेटमध्ये परतणे माझ्यासाठी कठीण नाही. कारण क्रिकेट माझ्या रक्तात आहे. त्यामुळे तुमच्या पेशाकडे परतणे कठीण वाटत नाही. तसंच मी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तयार आहे.

virat anushka