वादग्रस्त विधान

`मरा पण नेत्यांना मारुन मरा`, राज ठाकरेंचं वादग्रस्त विधान

वीज, पाणी तसंच दळवळणाच्या सुविधा नसल्यानंच विदर्भातला शेतकरी देशोधडीला लागलाय, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय. आत्महत्या हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचं उत्तर नसून `मरा पण नेत्यांना मारुन मरा`, असं वादग्रस्त विधानही त्यांनी यावेळी केलं. ते यवतमाळमध्ये मनसे उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

Apr 7, 2014, 10:34 PM IST

माझ्या बोलण्याचा माध्यमं विपर्यास करतात- शिंदे

मी जे काही बोलतो त्याचा प्रसारमाध्यमं विपर्यास करतात असा दावा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. पुण्यात काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वक्ता प्रशिक्षण शिबीरात ते बोलत होते.

Apr 28, 2013, 06:33 PM IST