अपघातानंतर अभिषेक बच्चनने का गाठलं चेन्नई?

अभिषेकने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या उजव्या हाताला प्लास्टर केल्याचं दिसत आहे.

Updated: Aug 26, 2021, 09:57 AM IST
अपघातानंतर अभिषेक बच्चनने का गाठलं चेन्नई? title=

मुंबई : मुंबईत शस्त्रक्रिया करून अभिनेता अभिषेक बच्चन आपल्या पुढील चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करण्यासाठी चेन्नईला परतला आहे. अभिषेक चेन्नईत अपघात झाल्यानंतर उपचारासाठी मुंबईत परत आला. ‘गुरू’ अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांसोबत त्याच्या इन्स्टाग्रामवरुन माहिती शेअर केली.

अभिषेकने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या उजव्या हाताला प्लास्टर केल्याचं दिसत आहे. त्याच हाताचा अंगठा दाखवताना अभिषेक दिसत आहे. अभिषेकने कॅज्युअल स्काय ब्लू कलरची हूडी, ब्लू डेनिम जीन्स आणि व्हाइट स्नीकर्स घातले आहेत. अभिनेत्याने काळ्या रंगाचा मास्क आणि स्टायलिश चष्मा देखील घातला आहे.

“गेल्या बुधवारी माझ्या नवीन चित्रपटाच्या सेटवर चेन्नईमध्ये एक विचित्र अपघात झाला. माझा उजवा हात फ्रॅक्चर झाला. तो ठीक करण्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक! त्यामुळे मुंबईला घरी परतण्याचा एक जलद प्रवास. शस्त्रक्रिया केली, सर्व पॅच-अप आणि कास्ट केले. आणि आता चेन्नईला परत काम सुरू करण्यासाठी, ” असं ज्युनिअर बच्चनने  लिहिले आहे.

अभिषेक पुढे म्हणाला, “जसे ते म्हणतात ना... शो चालू राहिला पाहिजे! आणि माझ्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे.... मर्द को कभी दर्द नहीं होता ”.