'बँकरप्ट झालो, गर्लफ्रेंडने काळी जादू केली', प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

अभिनेत्याच्या एका वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे. 

Updated: Nov 29, 2022, 04:22 PM IST
'बँकरप्ट झालो, गर्लफ्रेंडने काळी जादू केली', प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा title=

मुंबई : टीव्ही अभिनेता आयुष खतरी बऱ्याच मालिकांमध्ये दिसला आहे. आपल्या अभिनयाने नेहमीच त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. मात्र गेले अनेक दिवस तो टीव्हीपासून दूर आहे. मात्र नुकतंच अभिनेत्याच्या एका वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे. यावेळी बोलताना त्याने सांगितलं की, तो एक्टिंगपासून का दूर राहिला. यामागे एक दुख:द कहाणी आहे. ज्यामधून आयुष गेला आहे.

आयुष खतरीच्या म्हणण्यानुसार तो एका वाईट रिलेशनशिपमध्ये होता. ज्याचे त्याच्यावर खूप वाईट परिणाम झाले. तो बँककरप्टचा शिकार झाला, परिवारापासून दूर गेला, डिप्रेशनमध्ये गेला आणि मेंन्टली हरैस झाला. दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपल्या वाईट फेजवर स्पष्टपणे त्याने भाष्य केलं आहे. यावेळी आयुषने सांगितलं की, जेव्हा तो मुंबईमध्ये बँककरप्ट झाला तेव्हा त्याची भेट एका मुलीसोबत झाली. 

गर्लफ्रेंडने दिला धोका
अभिनेत्याने पुढे सांगितलं की, मला एक मैत्रिण भेटली, जी एक फेमस चॅनलमध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टरम्हणून काम करते. आम्ही डेटिंग सुरु केलं. आणि लिव्ह-ईन रिलेशनशिपमध्ये राहू लागलो. काही वेळानंतर चांगली कमाई होवू लागली. मला खरंच माहित नव्हतं की, ही माझ्या वाईट दिवसांची सुरुवात आहे. ज्या मुलीवर मी जिवापाड प्रेम करत होतो. 

तिच्या माझ्याविषयी दुष्ट भावना होत्या. तिने माझ्या बँकेवर नियंत्रण ठेवलं आणि माझा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली. एवढंच नाही तर तिने मला माझ्या कुटुंबीयांपासून आणि मित्रांपासून दूर ठेवलं. माझे आजारी वडील माझी काळजी करत होते. माझी आई मला भेटायला आली तेव्हा तिने मला त्यांनाही भेटू दिलं नाही.

गर्लफ्रेंडवर ब्लॅक मॅजिकचा आरोप
आयुष खतरीने आपल्या गर्लफ्रेंडवर आरोप लावला आहे की, तिने माझ्यावर ब्लॅक मॅजिक केली होती. 'टशन-ए-इश्क' फेम एक्टरने सांगितलं की, तिला काळी जादू यायची. मी डिप्रेशनमध्ये जात होतो आणि मी काहिच काम करु शकत नव्हतो. एकदिवशी माझ्याकडचे सगळे पैसे संपले. आणि मी एकटा पडलो. अशा परिस्थितीत तिने मला सोडलं. माझ्या फ्रेंड्सने मला माझ्या घरी नेवून सोडलं. 

माझ्या आईने मला संभाळलं. मला पॅनिक अटॅक यायचे. मी पुर्णपणे तिच्या जाळ्यात अडकलो होतो.'' अनेक वर्षे इंडस्ट्रीपासून दूर राहिल्यानंतर आयुषने करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या तो आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत आहे.