नागपूरच्या तरुणीची ठाण्यात बालमित्रांकडून हत्या

२० ते २५ दिवसांपूर्वी कॉल सेंटरमध्ये नोकरीसाठी आलेल्या नागपूरच्या तरुणीची ठाण्यात हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिच्या बालमित्रानेच तिची हत्या केली आहे.

Updated: Sep 6, 2017, 12:44 PM IST
नागपूरच्या तरुणीची ठाण्यात बालमित्रांकडून हत्या title=

ठाणे : २० ते २५ दिवसांपूर्वी कॉल सेंटरमध्ये नोकरीसाठी आलेल्या नागपूरच्या तरुणीची ठाण्यात हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिच्या बालमित्रानेच तिची हत्या केली आहे.

याचा सुगावा कुणालाही लागू नये म्हणून त्यांनी तिचा मृतदेह बेळगावजवळ नेऊन फेकला. आरोपींना रत्नागिरीत अटक करण्यात आली आहे. 

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, अंकिता उर्फ हिना कनोजिया असं या तरुणीचं नाव आहे. ही तरूणी मूळची नागपूरची होती. हिनाच्या दोन मित्रांनी तिला अंबरनाथमध्ये पार्टीला बोलवलं होतं. तिथेच त्यांनी हिनाची हत्या केली. मात्र, हत्या करण्याचं कारण अद्याप कळू शकलं नाही. 

आरोपींनी हिनाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आणखी एका मित्राला बोलवून घेतलं. पण त्याला यातील काहीही सांगितलं नाही. कुठेतरी फिरायला जाऊ असं त्यांनी त्याला खोटं सांगितलं. त्यानुसार, मुलीचा मृतदेह बेळगावातील निपाणीजवळ तो मृतदेह फेकून दिला. पण मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर तिसऱ्या मित्राला याची कुणकुण लागली. त्याने याबाबतची माहिती पोलिसांनी दिली. रत्नागिरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

हिनाने एका खासगी वसतीगृहात राहात होती. गेल्या दोन दिवसांपासून तिचे कुटुंबीय हिनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते, मात्र काही केल्या संपर्क होत नव्हता. मंगळवारी रत्नागिरी पोलिसांनी कनोजिया कुटुंबियांना फोन करुन हिनाची हत्या झाल्याचं सांगितलं.