मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; १५ ठार

पालघर तालुक्यातील मेंढवण गावाजवळ बसला भीषण अपघात झालाय. लक्झरी बस पुलावरुन कोसळून १५ जण ठार झालेत.

Updated: May 29, 2013, 10:20 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पालघर
पालघर तालुक्यातील मेंढवण गावाजवळ बसला भीषण अपघात झालाय. लक्झरी बस पुलावरुन कोसळून १५ जण ठार झालेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील या अपघातामुळे वाहतूकीची कोंडी झालीये. मुंबईहून अहमदाबादकडे ही बस जात होती. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.
बसला झालेल्या अपघातात जखमींची संख्या अजूनही समजू शकलेली नाही. अनेक प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
लक्झरी बस आणि कंटेनरचा झालेल्या अपघात १५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही धडक समोरा-समोर झाल्याने लक्झरी बस पुलावर खाली कोसळली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.