assembly 2014

वर्धा मतदारसंघाचा ग्राऊंड रिपोर्ट

वर्धा मतदारसंघाचा ग्राऊंड रिपोर्ट

Oct 8, 2014, 05:55 PM IST

ऑडिट नागपूर जिल्ह्याचं...

महाराष्ट्राची उपराजधानी असं ज्या शहराची ओळख आहे. संत्रानगरी नागपूर, देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं हरीत शहर... भारताचा मध्य अशी अनेक वैशिष्ट्य लाभलेला नागपूर जिल्हा. राज्याच्या राजकीयपटलावर या जिल्ह्याला महत्त्व आहे. 

Oct 8, 2014, 05:49 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - काटोल

काटोल विधानसभा मतदारसंघ हा नागपूर जिल्ह्यातील आणखी एक महत्वाचा मतदारसंघ... संत्रा उत्पादनासाठी हा परिसर प्रसिद्ध आहे. राजकीय दृष्ट्याविचार केल्यास काटोल हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. 

Oct 8, 2014, 05:47 PM IST

हा विदर्भाच्या जनतेचा अपमान - विलास मुत्तेमवार

महाराष्ट्र अखंड राहणार असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोंडाईचाच्या सभेत म्हटलं, म्हणजेच स्वतंत्र विदर्भ होणार नाही, यामुळे विदर्भाचा अपमान झाला, असं काँग्रेसचे विलास मुत्तेमवार यांनी म्हटलंय. 

Oct 8, 2014, 05:44 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - नागपूर उत्तर

राज्याचे रोजगार हमी आणि जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांचा हा मतदारसंघ... काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या या मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती आहे त्याचा वेध घेणारा हा रिपोर्ट.

Oct 8, 2014, 05:43 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - नागपूर दक्षिण-पश्चिम

भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचा नागपूरातला दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघ... देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विकासकामे केल्याचा दावा केलाय. तर विरोधकांचा त्यांच्या या दाव्यांवर आक्षेप आहे.

Oct 8, 2014, 05:40 PM IST

ऑडिट रत्नागिरी जिल्ह्याचं...

विस्तिर्ण समुद्र किनारा, नारळ-पोफळी आणि आंबाच्या बागांनी वेढलेला रत्नागिरी जिल्हा...  पौराणिक तसेच ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या जिल्ह्याला तेव्हडंचं राजकीय महत्व आहे.

Oct 8, 2014, 05:33 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - रत्नागिरी

राज्याचे नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचं हे ऑडिट... मंत्रीपद मिळालेल्या उदय सामंत यांनी मतदार संघावर छाप तर पाडलीये. मात्र युतीची एकजूट त्यांच्यासाठी महागात पडू शकते. 

Oct 8, 2014, 05:32 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - राजापूर

राजापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसचा हात धरला आणि हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला. मात्र पुढे राजन साळवींनी 2009 मध्ये पुन्हा इथं सेनेचा भगवा फडकवला.

Oct 8, 2014, 05:28 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - गुहागर

विद्यमान कामगारमंत्री भास्कर जाधव यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी फिक्स मानली जातेय. तर हा मतदारसंघ जागावाटपात शिवसेनेकडे गेल्याने भाजपची गोची झाली आहे. मात्र तरीही भाजपचे डॉ. विनय नातू पुन्हा एकदा निवडणुकीसाठी सज्ज झालेत. 

Oct 8, 2014, 05:24 PM IST

ऑडिट सांगली जिल्ह्याचं...

सांगली नाट्यपंढरी, सहकारपंढरी म्हणून जेवढी प्रसिद्ध तेव्हढीच क्रांतीकारकांची जवानांची नगरी म्हणूनही सांगलीची ओळख आणि राजकीय पटलावर चार वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भुषवलेले वसंतदादा पाटील हेही याच सांगली जिल्ह्याचे सुपूत्र.

Oct 8, 2014, 05:19 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - इस्लामपूर

सांगली जिल्ह्यातला इस्लामपूर मतदारसंघ म्हणजेच पूर्वीचा वाळवा मतदारसंघ. राज्याचे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांचा हा मतदारसंघ. विरोधकांना नामोहरम करण्यात प्रत्येकवेळी जयंत पाटील यशस्वी ठरले आणि म्हणूनच सलग पाच विधानसभा निवडणुकांमध्ये ते या मतदारसंघातून विजयी पताका मिरवत आहेत. 

Oct 8, 2014, 05:18 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - पलूस-कडेगाव

धक्कादायक निकाल देणारा मतदारसंघ म्हणून सांगली जिल्ह्यातल्या पलूस-कडेगाव मतदारसंघाची ओळख. स्वतः वनमंत्री पतंगराव कदम हे या मतदारसंघातून पाच वेळा विजयी झाले असले, तरी त्यांनाही तीन वेळा पराभूत व्हावं लागंलय. त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी पृथ्वीराज देशमुख यांनी यावेळी त्यांना कडवं आव्हान देण्याचं मनावर घेतल्याने लढत रंगतदार आहे हे निश्चित.

Oct 8, 2014, 05:13 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - वसई

वसई विधानसभा मतदारसंघातही आगामी विधानसभा निवडणूकीत जोरदार चुरस पहायला मिळणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार विवेक पंडीत यांनी बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत केलं होतं. 

Oct 8, 2014, 05:03 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - पालघर

महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा अशी ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली. एकाबाजूला विस्तिर्ण समुद्र किनारा तर दुस-या बाजूला डोंगरदऱ्या आणि घनदाट जंगल अशी नैसर्गिक साधन संपत्ती लाभलेला पालघर जिल्हा राजकीयदृष्ट्या महत्वाचा मानला जातो.

Oct 8, 2014, 05:00 PM IST