-
-
४,०,११,५,५,०,०,४,४,४ हा कोणताही फोन नंबर नाही आहे. तर हे आहे टीम इंडियातील एक दिग्गज बॅट्समनचे रन. जे त्याने श्रीलंकेत खेळलेल्या गेल्या १० वनडे मॅचमध्ये केले आहेत.
अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सूर्य ग्रहण पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये सूर्याच्या अगोदर चंद्र जाणार असून हे तब्बल ९९ वर्षानंतर २१ ऑगस्ट रोजी म्हणजे आज दिसणार आहे. लोकांमध्ये हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी प्रचंड उत्साह असला तरीही त्यांनी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.
गणेशोत्सवाला अवघे ३ दिवस राहिले असताना बाप्पाच्या आगमनाची लगबग आपल्याकडे दिसत आहे. बाप्पाचे हटके रूप आपल्याकडे असावं अशी साऱ्यांचीच इच्छा असते.
मीरा भाईंदर पालिका निवडणुकीचा निकाल हाती आला. आणि पुन्हा एकदा चित्र स्पष्ट झालं. भाजपचा निर्विवाद विजय मीरा - भाईंदर पालिकेवर झाला आहे. या विचायानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी २ ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या फॅन्सचे अनेक किस्से आपण पाहिलेत आणि ऐकलेत देखील. पण बॉलिवूड बेबो सोबत काही दिवसांपूर्वी एक असा किस्सा घडला ज्यामुळे ती आणि तिच्यासोबत असणारी सर्व मंडळी अगदी चकितच झाली.
आज बैल पोळा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात आणि इतर राज्यात अतिशय उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी शेतकऱ्याचा सच्चा साथी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.
गणेशोत्सव उत्सवाची धूम आता सगळीकडे पाहायला मिळते. अवघ्या एका आठवड्यावर हा सण येऊन ठेपलाय. सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी दिसत असताना एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'काखेत कळसा नि गावाला वळसा' या म्हणीच्या उक्तीप्रमाणे आपल्या सगळ्यांना अनेकदा अनुभव आला असेलच. पण हा वळसा किती दिवस असू शकतो. एक, दोन जास्तीत जास्त महिनाभर... पण इथे घडलेला हा तब्बल १३ वर्षांचा.
आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा एस्ट्रॉयड लघुग्रह १ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. मात्र यामुळे कुणालाही कोणताही धोका होणार का? अशी चर्चा रंगली असताना नासाने दिलेल्या माहितीनुसार कुणालाही याचा त्रास होणार नाही.
नासा ही अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था कायमच वेगवेगळ्या सॅटेलाईटच्या माध्यमातून जगातील विविध नैसर्गिक घटनांवर नजर ठेऊन असते. आता नासाच्या सॅटेलाइटने एक इमेज पोस्ट केली आहे. त्यात दक्षिण आशियातील सर्वात प्राणघातक पावसाची माहिती दिली आहे. भारताच्या उत्तर भागात, बांग्लादेश आणि नेपाळ या ठिकाणी झालेल्या प्राणघातक अतिवृष्टीमुळे २५० नागरिकांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.