करवाचौथच्या दिवशी पत्नीवर हल्ला करुन पतीची आत्महत्या

दिल्लीच्या रोहिणी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आलीये. आपांपसातील भांडणानंतर एका पतीने पत्नीवर चाकूच्या सहाय्याने हल्ला केलाय. 

Updated: Oct 8, 2017, 05:16 PM IST
करवाचौथच्या दिवशी पत्नीवर हल्ला करुन पतीची आत्महत्या title=

नवी दिल्ली : दिल्लीच्या रोहिणी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आलीये. आपांपसातील भांडणानंतर एका पतीने पत्नीवर चाकूच्या सहाय्याने हल्ला केलाय. त्यानंतर स्वत: गळफास लावून घेत आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलीस तातडीने तिथे दाखल झाले आणि दोघांनीही रुग्णालयात दाखल केले. मात्र पतीचा यात मृत्यू झाला. महिलेवर उपचार सुरु आहेत.

शनिवारी रात्री साधारण १२ वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. दिल्लीच्या रोहिणी परिसरातील सेक्टर १६मधील एफ ब्लॉकच्या समोर एका महिलेचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पाहिल्यानंतर शेजाऱ्यांनी आरडाओरडा सुरु केला. 

मिळालेल्या माहितीनुसार, जसविंद आणि त्याची पत्नी हीना यांचा ५ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. ते रोहिणी सेक्टर १६मध्ये भाड्याच्या घरात राहत होते. दोघांमध्ये नेहमीच भांडण होतं. गेल्या महिन्याभरापासून जसविंदर आपल्या कुटुंबासोबत राहत होता. तर हीना आपल्या ४ वर्षाच्या मुलीसह बहिण-भावाकडे राहत होती. 

शनिवारी रात्री साधारण १२ वाजण्याच्या सुमारास जसविंदर तेथे आला आणि बोलण्यासाठी म्हणून पतीला छतावर घेऊन गेला. यावेळी त्यांच्यात जोरदार भांडण झाले. यादरम्यान जसविंदरने रागात पत्नीवर चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर जसविंदरनेही छतावरुन उडी मारत आत्महत्या केली. दोघांना रुग्णालयात नेण्यात आलं. महिलेवर उपचार सुरु आहेत मात्र जसविंदरचा मृत्यू झाला. 

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही कधीही सोसायटीतील लोकांशी बोलत नसत. तसेच त्यांना कोणी इतर जास्त ओळखतही नव्हते.