फिल्म रिव्ह्यू : 'किल्ला' नात्यांच्या तटबंदीचा!

आज प्रदर्शित झालेल्या सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे किल्ला... या सिनेमानं 'बर्लिन फिल्म फेस्टीवल'मध्ये मराठीचा झेंडा रोवलाच पण त्याच बरोबर राष्ट्रीय पुरस्कारांवरही आपले वर्चस्व दाखवून दिलंय. 

Updated: Jun 26, 2015, 04:51 PM IST
फिल्म रिव्ह्यू : 'किल्ला' नात्यांच्या तटबंदीचा! title=

 

चित्रपट : किल्ला 
दिग्दर्शक : अविनाश अरुण 
कलाकार : अमृता सुभाष, अर्चित देवधर, पार्थ भालेराव 

मुंबई : आज प्रदर्शित झालेल्या सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे किल्ला... या सिनेमानं 'बर्लिन फिल्म फेस्टीवल'मध्ये मराठीचा झेंडा रोवलाच पण त्याच बरोबर राष्ट्रीय पुरस्कारांवरही आपले वर्चस्व दाखवून दिलंय. 

कथानक
किल्ला ही कहाणी आहे चिनू उर्फ चिन्मय काळे या लहान मुलाची... त्याच्या आईच्या नोकरीतील  कायम बदलीमुळे चिनूला प्रत्येक नव्या जागेशी, तिथल्या नव्या लोकांशी अॅडजस्ट व्हायला वेळ लागतो... अशाच प्रकारे एकदा नोकरीत बदलामुळे चिनू आणि त्याची आई पुण्याहून कोकणात येतात. एका नव्या जागी आल्यामुळे चिनू खूप एकटं एकटं वाटतं... त्याला ती जागा खूप परकी वाटते... ज्यामुळे त्याचं एकाकीपण वाढतं. मग अशातच शाळेतल्या काही नव्या मित्रांसोबत त्याची ओळख होते. ते एकमेकांचे घट मित्र होतात. 

किल्ला ही कथा आहे एका आई आणि तिच्या मुलाची... त्यांचातल्या गोड नात्याची... शाळेची आणि मित्रांच्या आठवणींची... यात अभिनेत्री अमृता सुभाषनं चिनूच्या आईची व्यक्तिरेखा साकारली आहे. एका  सिंगल मदरची भूमिका तिनं बजावली आहे. आपल्यातल्या प्रामाणिक पणामुळे तिची कायम वेगवेगळ्या ठिकाणी बदली होत असते तर चिन्मय काळे जी व्यक्तिरेखा साकारलीय अभिनेता अर्चित देवधर यानं... या सगळ्या गोष्टी खूप छान आणि वेगळ्या पद्धतीनं दिग्दर्शक अविनाश अरुण यांनी रंगवल्या आहेत.

दिगदर्शन
अविनाश अरुण या नवोदित दिगदर्शकानं या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. एक अगदी साधी सिंपल कथानक अतिशय सुंदर आणि क्रिएटीव्हली मांडण्याचा प्रयत्न अविनाश केलाय. कोकणाच्या निसर्गाला खुपच सुंदर पद्धतीनं प्रेसेंट करण्यात आलंय. 

एक आई आणि मुलगा यांच्याभोवती फिरणारे हे कथानक खूप रंजक आणि कलात्मक दृष्टीकोणातून साधण्याचा प्रयत्न केलाय. या सिनेमातचा एक महत्वाचा अंग म्हणजे याची सिनेमेटोग्राफी... एक दिगदर्शक म्हणून अविनाशनं स्वत:ला सिद्ध केलंय यात शंकाच नाही पण याचबरोबर एक सिनेमाटोग्राफर म्हणूनही त्यानं जे काम केलंय त्यसाठी त्याला पैंकीच्या पैकी मार्क... 

ज्या पद्धतीनं कोकाणतलं ते निसर्ग चित्रीत करण्यात आलंय, असं वाटतं की आपण निसर्गावरील फोटोचा एक अल्बम पाहतोय की काय... या सगळ्या गोष्टी खूपच कलात्मक आणि रिफ्रेशिंग वाटतात. 

या सिनेमातल्या एका सीनचा विशेष उल्लेख करावासा वाटतो जिथे छिनू आणि त्याची मित्र किल्ल्यावर सायकलची रेस लावतात. किल्ल्यावर पोहचल्यानंतर जोरदार पाऊस पडतो... आणि चिनू अर्थातच अभिनेता अर्चित देवधर या त्या भल्या मोठ्या किल्लात वाट हरवतो.  हा सीन ज्या पद्धतीनं दिगदर्शक आणि सिनेमाटोग्राफर अविनाश अरुणनं चित्रीत केलाय, त्यासाठी त्याला खरंच हॅटस ऑफ... अशी या सिनेमातली अनेक दृष्य तुम्हाला एका वेगळ्याच जगात घेऊन जाते.

अभिनय
अर्चित देवधर, पार्थ भालेराव आणि यातल्या बच्चे कंपनीची धमाल गॅंग अभिनयाच्या बाबतीतही एकसे बढकर एक आहेत. अर्चित देवधर ज्यानं या सिनेमात प्रमुख भूमिका बजावली आहे, या सिनेमात खऱ्या अर्थानं तो बाजी मारतो. त्याचा अभिनय, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव हे सगळं खरंतर एका 'मंजेहुए' कलाकारापेक्षा काही कमी नाही.

तर पार्थ भालेराव ज्यानं भुतनाथ आणि या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला आहे, त्याचा अभिनय अत्यंत सुरेख झालाय. या सिनेमातही त्यानं जबरदस्त बॅटींग केलीय. याचबरोबर अभिनेत्री अमृता सुभाषनंदेखील नेहमी प्रमाणे तिचा बेस्ट परफोर्मेंन्स दिलाय. कोणत्याही मेक अपशिवाय अगदी साध्या लूकमध्ये ती आपल्याला दिसते. तिच्या त्या रिअॅलिस्टिक लूकप्रमाणेच तिनं अत्यंत रिअॅलिस्टिक अभिनयही या सिनेमात केलाय.

शेवटी काय तर... 
किल्ला हा एक वन वॉच असा सिनेमा असलातरी हल्लीच्या यंग जनरेशनला विशेषकरुन बच्चे कंपनीसाठी हा सिनेमा एक मेजवानी ठरेल यात शंका नाही. हा एक फूल्लऑन सिनेमा असून आम्ही या सिनेमाला देतोय ३.५ स्टार्स 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.