औरंगाबादमध्ये मतदारराजाचा कौल कोणाला ?

चार नगरपालिकांसाठी मतदान पार पडलं. यात कन्नड, पैठण, गंगापूर आणि खुलताबाद या नगरपालिकांचा समावेश होता. तर वैजापूर नगरपालिकेची निवडणूक कोर्टाच्या आदेशानं लांबणीवर पडली आहे.

Updated: Dec 18, 2016, 06:23 PM IST
औरंगाबादमध्ये मतदारराजाचा कौल कोणाला ? title=

औरंगाबाद : चार नगरपालिकांसाठी मतदान पार पडलं. यात कन्नड, पैठण, गंगापूर आणि खुलताबाद या नगरपालिकांचा समावेश होता. तर वैजापूर नगरपालिकेची निवडणूक कोर्टाच्या आदेशानं लांबणीवर पडली आहे.

कन्नड नगरपालिकेवर सध्या कॉंग्रेसची सत्ता आहे. इथं कॉंग्रेस आणि शिवसेनेत लढत असली तरी, शिवसेनेत असूनही हर्षवर्धन जाधव यांनी स्वतंत्र रायभान आघाडी तयार केली आहे. त्यामुळं मोठी चुरस निर्माण झाली आहे.

पैठण नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा आहे. पळवापळवीचे राजकारण, सर्वच पक्षांनी लावलेली ताकद आणि बड्या नेत्यांच्या झालेल्या सभांमुळे ही निवडणूक महत्वाची मानली जात आहे.. तर गंगापूरची नगरपालिका कॉंग्रेसच्या ताब्यात आहे.

आमदार प्रशांत बंब यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळं संजय जाधव यांना ही निवडणूक सोपी नसल्याची चर्चा आहे. खुलताबाद नगरपालिकेवर आमदार बंब यांचं वर्चस्व आहे. आता मतदारराजानं यंदा कुणाला कौल दिला आहे ते सोमवारी स्पष्ट होणार आहे.