हत्या, लुटीच्या घटनांनी रत्नागिरी शहर हादरलं

हत्या, लुटीच्या घटनांनी रत्नागिरी शहर हादरले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 

Updated: Sep 2, 2015, 09:03 PM IST
हत्या, लुटीच्या घटनांनी रत्नागिरी शहर हादरलं title=

रत्नागिरी : हत्या, लुटीच्या घटनांनी रत्नागिरी शहर हादरले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 

रत्नागिरीत सध्या चाललंय काय असा प्रश्न निर्माण झालाय. कारण चार दिवसांत दोन हत्या आणि एक लुटीची घटना शहरात घडलीय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. रत्नागिरीच्या एमआयडीसी परिसरात कोकण रेल्वेच्या गजबजलेल्या ओव्हर ब्रीजजवळ शैलेश जाधव या तरुणाला लुटलं. कैवळ दैव बलवत्तर म्हणून तो या हल्ल्यातून वाचलाय. 

पाहा व्हिडिओ 

लुटालुटीच्या वाढत्या घटनांनंतर पोलीस यंत्रणाही अलर्ट झालीय. गेल्या चार दिवसात दोन हत्या आणि आता लुटालुटीची घटना घडल्यामुळे नागरिक भयभीत आहेत. पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.