वारंवार घोषणा करूनही प्रवाशांना अक्कल येईना

मुंबईत दरदिवशी लोकलप्रवासादरम्यान प्रवाशांचे जीव जातात. मुंबईतल्या रेल्वे प्रवाशांना स्थानकांवर वारंवार अनाऊंसमेंटद्वारे सुरक्षेचे उपाय सांगितले जातात. पण प्रवासी या घोषणा कधीच मनावर घेत नाहीत. 

Updated: Mar 17, 2016, 09:07 AM IST
वारंवार घोषणा करूनही प्रवाशांना अक्कल येईना title=

मुंबई : मुंबईत दरदिवशी लोकलप्रवासादरम्यान प्रवाशांचे जीव जातात. मुंबईतल्या रेल्वे प्रवाशांना स्थानकांवर वारंवार अनाऊंसमेंटद्वारे सुरक्षेचे उपाय सांगितले जातात. पण प्रवासी या घोषणा कधीच मनावर घेत नाहीत. 

टपावरून प्रवास करू नका ही अनाऊंसमेंट रेल्वेकडून वारंवार केली जाते तरीही प्रवासी हा प्रवास करतातच. टिळकनगर रेल्वे स्थानकात ब्रिजवरून घेतलेली ही दृष्य पाहा. 

टपावरून प्रवास करणारे स्वतःचा जीव कसा धोक्यात घालतात त्याची ही थरकाप उडवणारी दृष्य आहेत. असा प्रवास करणा-यांना आमची कळकळीची विनंती तुमची कोणीतरी घरी वाट पाहतंय.