Entertainment : 90 च्या दशकातील गाजलेल्या 'या' 6 मालिका, प्रेक्षकांच्या आजही आठवणीत

Entertainment : आज भारतात विविध भाषेतील अनेक चॅनेल्स (Channels) असून शेकडो मालिका छोट्या पडद्यावर अर्थात टीव्हीवर (TV) येत असतात. मनोरंजन (Entertainment), ऐतिहासिक (Historical), गुन्हे (Crime) असो की विनोदी अनेक पर्याय प्रेक्षकांना उपलब्ध आहेत. आपल्या देशात टीव्ही मालिका (TV Serials) बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्याही कोट्यवधींच्या घरात आहे. सध्याच्या काळात दिवसभर कोणती ना कोणती मालिका टीव्हीवर सुरु असते. भारतात 1959 मध्ये दूरदर्शनची स्थापना झाली.पण टीव्ही मालिकांची सुरुवात 80-90 च्या दशकात झाली. त्यावेळी बहुतांश मालिका कौटुंबिक किंवा धार्मिक विषयांवर आधारित होत्या.

| May 06, 2023, 19:00 PM IST
1/6

हम लोग

पहिल्या दैनंदिन हिंदी मालिकेचा मान जातो तो दूरदर्शनवरच्या हम लोग या मालिकेला. या मालिकेचे दिग्दर्शक होते पी.कुमार वासूदेव. एक मध्यमवर्गीय कुटुंब आणि त्यांचा संघर्ष यावर ही मालिका आधारित होती. 1984-85 सालादरम्यान ही मालिका दूरदर्शनवर दाखवली जात असे.

2/6

मालगुडी डेज

आर के नारायण यांच्या कथांवर आधारिक मालगुजी डेजचं दिग्दर्शन शंकर नाग यांनी केलं होतं. ही मालिका 1986 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झाली. दूरदर्शनच्या सुवर्ण दिवसातील मालिकेपैकी मालगुडी डेज ही एक मालिका होती. या मालिकेची कहाणी मालुगडी नावाच्या एका काल्पनिक शहरावर होती.

3/6

रामायण

1987-88 काळात दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या रामायण या मालिकेने सर्व विक्रम मोडले. लोकांची मनावर या मालिकेची अशी जादू होती की मालिका सुरु झाल्यावर सर्व रस्ते सामसूनम व्हायचे, लोकं टीव्हीसमोर बसून पूजा करायचे. रामानंद सागर दिग्दर्शिक या ऐतिहासिक मालिकेत अरुण गोविल यांनी रामाची तर दीपिका चिखलियाने सीतेची भूमिका साकारली होती. आजही या कलाकारांना लोकं त्या भूमिकेसाठी ओळखतात.

4/6

महाभारत

बी.आर. चोपडा दिग्दर्शक महाभारत या मालिकेलाही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. रामायण मालिकेप्रमाणेच महाभारत सुरु झाली की सर्व कुटुंब एकत्र येऊन मालिका पाहिला जात होती. 1988-89 च्या काळात सुरु झालेल्या या मालिकेतील कलाकारांची आज चाळीस वर्षांनंतरही तिच ओळख आहे.

5/6

ब्योमकेश बख्शी

1993-97 दरम्यान आलेल्या ब्योमकेश बख्शी या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच दूरदर्शनवर वेगळा प्रयोग पाहिला मिळाला. हेरगिरी प्रकरणांवर आधारित या मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. बंगाली लेखख शरदेंदु बंद्योपाध्याय यांच्या कहाण्यांवर आधारित मालिका होती. अभिनेते रजत कपूर यांनी ब्योमकेश बख्शीची भूमिका साकारली होती.

6/6

फौजी

बॉलिवूडचा किंग खान अर्थान शाहरुख खानने आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती दूरदर्शनवरच्या फौजी या मालिकेतून. भारतीय सैन्याच्या प्रशिक्षण अकॅडेमीतील जवानांच्या जीवनावर आधारित या मालिकेत शाहरुख खान प्रमुख भूमिकेत होता. 1988 च्या काळात ही मालिका प्रसारित झाली होती.