IND VS END: विराट कोहलीनं 3 बदल केल्यास दुसरा सामना जिंकण्याची शक्यता
इंग्लंड विरुद्ध भारत 4 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला. दुसऱ्या सामन्यात जिंकणं भारतासाठी खूप महत्त्वाचं आहे.
2/4
टॉस आणि मॅच जिंकण्याचं आव्हान
इंग्लंड विरुद्ध भारत 4 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला. दुसऱ्या सामन्यात जिंकणं भारतासाठी खूप महत्त्वाचं आहे. पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारणार्या संघाचा दुसर्या डावात निश्चितच फायदा होतो. परंतु त्यानंतरही त्यांनी अखेरच्या दिवशी भारताला 420 धावांचे लक्ष्य दिले. अशा परिस्थितीत विराट कोहली आणि टीम इंडिया नाणेफेक जिंकून बोर्डवर मोठी धावसंख्या ठेवू इच्छित आहेत.
3/4
नदीमच्या जागी कुलदीप?
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं पहिल्या सामन्यात चायनामॅन कुलदीप यादवला संधी दिली नाही. तर स्पिनर शाहबाज नदीमला संघात संधी दिल्यानं त्याचा निर्णय चुकल्याची चर्चा आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीपला बाहेर ठेवल्यानं विराट कोहलीवर सोशल मीडिया आणि तज्ज्ञांकडून टीकेचा सामना करावा लागला होता. पहिल्या सामन्यात नदीमला अवघ्या चार विकेट्स मिळाल्या, त्यासाठी त्याने 233 धावा खर्च केल्या. याशिवाय त्याने एकूण एकूण 9 नो बॉल्सही टाकले. कुलदीप यादवने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2019 मध्ये सिडनी येथे शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्या सामन्यात त्याने एका डावात 5 विकेट्स घेतल्या. कुलदीपच्या 6 कसोटी सामन्यांमध्ये 24 विकेट्स स्वत:च्या नावावर केल्या होत्या. त्यामुळे येत्या सामन्यांमध्ये त्यांचं संघात असणं किती गरजेचं आहे यावरून आपण अंदाज साधारण बांधू शकतो.
4/4