IND vs AUS: टीम इंडियामध्ये चाललंय काय? Virat Kohli का राहतोय संघापासून लांब?

IND Vs AUS,2nd test:विराट कोहली (Virat Kohli) खेळाडूंपासून लांब रहायला गेला आहे. त्यामुळे टीम इंडियामध्ये चाललंय काय? असा प्रश्न क्रिडाविश्वात विचारला जातोय.

Updated: Feb 16, 2023, 08:46 PM IST
IND vs AUS: टीम इंडियामध्ये चाललंय काय? Virat Kohli का राहतोय संघापासून लांब? title=
ind vs aus kohli

India vs Australia, 2nd test: पहिल्या सामन्यात (IND vs AUS, 1st test) दणक्यात विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडिया 17 फेब्रुवारीपासून दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी दुसरी कसोटी (Delhi Test) खेळणार आहे. हा सामना जिंकून 2-0 अशी लीड घेण्याची संधी टीम इंडियाकडे चालून आली आहे. अशातच आता सामन्याआधी टीम इंडियाच्या हॉटेलमध्ये (Indian team's Hotel) बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर विराट कोहली (Virat Kohli) खेळाडूंपासून लांब रहायला गेला आहे. त्यामुळे टीम इंडियामध्ये चाललंय काय? असा प्रश्न क्रिडाविश्वात विचारला जातोय.

टीम इंडियाचे हॉटेल का बदलले?

टीम इंडियाचे हॉटेल्समध्ये चेंज करण्यात आलाय. सध्या लग्नसराईचा व्यस्त हंगाम सुरू आहे. याशिवाय G-20 शिखर परिषदेमुळे फाईव्ह स्टार हॉटेल्स बुक करण्यात येत आहेत. यासाठी संघाच्या हॉटेलमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 2017 पासून दिल्लीत कसोटी सामने खेळवले जात आहेत. मात्र, पहिल्यांदाच असा अडचणीचा सामना करावा लागतोय.

टीम इंडियाच्या खेळाडूंनी करकरडूमा येथील हॉटेल लीला येथे मुक्काम केला आहे. विराट कोहलीशिवाय संघातील सर्व खेळाडू येथे उपस्थित असल्याची माहिती मिळाली होती. विराट कोहली दिल्लीतील त्याच्या घरीच थांबलाय. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

Virat Kohli राहतोय खेळाडूंपासून लांब

कोहलीचे गुरुग्राम येथे स्वत:चं घर आहे आणि तो आपल्या कुटुंबीयांसह तेथे राहतोय. विराटला त्याच्या कुटुंबासोबत काही वेळ घालवायचा असल्याने तो खेळाडूंपासून लांब राहतोय, अशी माहिती समोर आली आहे. भारतीय खेळाडूंचं शेड्यूल टाईट असल्याने त्यांना जास्त वेळ फॉमिलीला देता येत नाही. त्यामुळे विराटने ही संधी साधून घरचा रस्ता पकडलाय.

आणखी वाचा - Ind vs Aus 2nd Test : दुसऱ्या टेस्टपुर्वी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये बदल, स्टार खेळाडूची एन्ट्रीBCCI: MS Dhoni होणार टीम इंडियाचा Chief Selector? क्रिडाविश्वात जोरदार चर्चा!

दरम्यान, टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (arun jaitley stadium) खेळवला जाणार आहे. या सामन्यापुर्वी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल झाला आहे.  पहिल्या टेस्ट सामन्याला मुकलेला स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पूर्णपणे तंदुरुस्त होऊन पुन्हा कमबॅक करतोय.