कंगना रानौतने हृतिकबद्दल केलं 'हे' वक्तव्य

 वाद पुन्हा एकदा चर्चेत  

Updated: Sep 30, 2019, 09:28 AM IST
कंगना रानौतने हृतिकबद्दल केलं 'हे' वक्तव्य  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद थांबण्याचं नावच घेत नाही. पुन्हा एकदा हा वाद चर्चेत आला आहे. कंगनाने अभिनेता हृतिक रोशनवर निशाणा साधला आहे. पुन्हा एकदा कंगनाने आपला राग व्यक्त करत एक वक्तव्य केलं आहे. 

कंगना रानौत आपल्याकडून हृतिकवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही. आता कंगनाने असं काही वक्तव्य केलंय की, ते ऐकून हृतिक देखील शांत बसणार नाही. कंगना म्हणाली की, जर ती हृतिक रोशन असती तर गप्प बसली नसती. 

बॉलिवूड लाइफने दिलेल्या माहितीनुसार, कंगना एका कार्यक्रमात गेली तेव्हा तिने हे वक्तव्य केलं आहे. कंगना रानौतला विचारलं की, जर तुला एक दिवसाचा हृतिक रोशन केलं तर तू काय करू इच्छिते. उत्तर देताना कंगना म्हणाले, आमच्या दोघांमध्ये जे काही झालं. किंवा आम्ही दोघांनी एकमेकांसोबत जे काही केलं त्यानंतर मी हृतिक असती तर कंगनाला फोन केला असता. आणि म्हटलं असतं की, मी तुझ्यासोबत जे काही केलं त्यासाठी 'सॉरी'.

तसेच त्या कार्यक्रमात कंगनाला एका दिवसाकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी केलं. तर ती पहिला कोणता बदल करेल. तेव्हा कंगना म्हणाली की, माझं एक छोटंस काम आहे. तिने पंतप्रधान मोदींकडे खासगी मागणी केल्यामुळे माफी देखील मागितली. ती म्हणाली की, चंदीगड ते मनाली हा खूप लांब रस्ता आहे. तिथे कोणतं चांगल एअरपोर्ट नाही. मी पंतप्रधान झाली तर मी, कुल्लूमध्ये एख एअरपोर्ट करेन.