एका रेडिट युझरने त्याची कंपनी त्याच्यावर नोटीस कालावधी वाढवण्यासाठी दबाव आणत असल्याचा दावा केल्यानंतर त्याने सल्ला मागण्यासाठी पोस्ट शेअर केली आहे. कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार त्याने 30 नोव्हेंबर रोजी राजीनामा दिला होता, त्याचा नोटीस कालावधी 30 जानेवारी रोजी संपणार होता. कंपनीच्या धोरणानुसार. पाच वर्षांहून अधिक काळ काम केल्यानंतर, त्यांनी त्यांच्या जागी येणाऱ्या व्यक्तीला प्रशिक्षण देण्यासाठी कालावधी एक आठवडा वाढवण्याची ऑफर दिली. कंपनीने योग्य उमेदवार मिळत नसल्याचा सांगत कर्मचाऱ्याचा नोटीस पिरियड्स 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्याचा आग्रह धरला. पण कर्मचाऱ्याला हे मान्य नाही.
कर्मचाऱ्याने नमूद केले की, त्याने ऑक्टोबरमध्ये त्याच्या तात्काळ व्यवस्थापकांना त्याच्या राजीनाम्याबद्दल खूप आधीच कळवले होते आणि आता त्याला एकूण पाच महिन्यांची नोटीस येत आहे. कर्मचाऱ्याने सांगितले की, त्याच्या राजीनाम्याचे कारण बर्नआउट आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या होते, ज्यामुळे त्याला कामाचा ताण सहन करणे कठीण होत होते. अशा परिस्थितीत हा त्रास आणखी वाढल्याचा सांगितला जात आहे. तसेच या परिस्थितीचा त्याच्यावर परिणाम होत असल्याच सांगितलं आहे.
कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या माहितीवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यावर एका युझरने म्हटले आहे की, बदली नसणे ही कर्मचाऱ्याची समस्या नाही. आणि त्याने नम्रपणे कंपनीला सांगून आपणास लवकर सोडण्यास सांगावे. कारण नवीन कंपनीत ही शब्द त्याची रुजू होण्याची तारीख महत्त्वाची ठरु शकते.
दुसऱ्या युझरने नोटिस कालावधी वाढवण्याच्या निर्णयावर टीका केली, रेडिटरला मूळ तारखेशी एकनिष्ठ राहणे महत्त्वाचे आहे. एवढंच नव्हे तर नियोजित नोटीस पिरियड्सला निघून जाण्याचे आवाहन केले, बदली न मिळणे ही त्याची जबाबदारी नसून तो कंपनीचा निर्णय आहे.
एका युझरने एचआर मॅनेजर आणि वरिष्ठ व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त केली आणि कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यासाठी तीन महिन्यांचा नोटीस कालावधी लागू करताना. तात्काळ कामावर ठेवण्याच्या त्यांच्या या पॉलिसीवर टीका केली. युझरने असा युक्तिवाद केला की, बदली प्रशिक्षणासाठी तीन महिने लागत नाहीत आणि जर एचआर योग्यरित्या भरती करत असेल तर दोन आठवडे पुरेसे असतील.