'पूरग्रस्तांना सरकारने जाहीर केलेली मदत अपुरी'

 सरकारने जाहीर केलेली मदत ही अपुरी असल्याची टीका

Updated: Aug 14, 2019, 04:10 PM IST
'पूरग्रस्तांना सरकारने जाहीर केलेली मदत अपुरी' title=

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या शिष्ठमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्यातील पूरपरिस्थिती या विषयावर भेट घेतली आणि निवेदन दिले. सरकारने जाहीर केलेली मदत ही अपुरी असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली. अभिनेत्री आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. 

उर्मिला यांनी पूरग्रस्त महिलांना भेटून त्यांच्या कडून अडचणींची माहिती घेतली. महापुराचा मोठा फटका या परिसराला बसला असून, इथं मदत कार्य सुरू आहे. मात्र लोकांचे संसार पाण्यात गेल्याने लोक रस्त्यावर आले आहेत.

शालेय विद्यार्थ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. महापुराने अनेक घरे उध्वस्त झाली आहेत. अनेक कुटुंब हे रस्त्यावर आलेली आहेत. या सर्वांचा जेवणाचा मोठा प्रश्न सध्या भेडसावत आहे. विविध संस्था या सध्या काम करत आहेत मात्र उध्वस्त झालेल्या कुटुंबियांचे पुनर्वसन तातडीने करणे गरजेचे आहे, अस मत उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केले आहे.