Mahavitaran Electricity Bill : केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेत देशाचा अर्थसंकल्प मांडला आणि या अर्थसंकल्पातून सामान्य नागरिकांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यानंतर आता सामान्यांना आणखी एक दिलासा मिळण्याची चिन्हं दिसत आहेत आणि यामागं कारण ठरेल ते म्हणजे वीजदरातील कपात.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थात महावितरणने (MSCB) पहिल्यांदाच घरगुती वीजदर कमी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळं राज्यातील नागरिकांना लवकरच वीज कमी दरात मोठा दिलासा मिळणार हे जवळपास निश्चित दिसत आहे. (Electricity Rates)
महावितरणं दिवसा वीज वापरणाऱ्या ग्राहकांना अधिक सवलत देण्याचा प्रस्ताव मांडला असून, नव्या आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल 2025 पासून लागू होणार असल्याचं म्हटलं जात आहे. राज्यात सौर ऊर्जा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येत असल्यामुळे वीजबिलातील ही घट शक्य होत असून सामान्यांना या प्रस्ताव आणि निर्मयाचा फायदा होताना दिसणार आहे.
कसं आहे दर कपातीचं गणित?
महावितरणच्या माहितीनुसार 100 हून कमी युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांना वीजबिलात 5.14 रुपयांवरून 2.20 रुपयांची घट लागू होऊ शकते. तर, 101-300 युनिटदरम्यान वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठीचे दर प्रति युनिट 11.60 रुपयांवरून 9.30 रुपयांपर्यंत खाली येणार आहेत.