गृहनिर्माण सोसायट्यांना राज्यसरकारचा दिलासा

तक्रारींची दखल घेत हा निर्णय घेण्यात आलाय 

Updated: Jul 13, 2018, 11:35 AM IST
गृहनिर्माण सोसायट्यांना राज्यसरकारचा दिलासा title=

मुंबई : राज्यातील लहान गृहनिर्माण सोसायट्यांना दिलासा मिळालाय. १०० पेक्षा कमी सदस्य असतील तर निवडणूक घेण्याची आवश्यकता नाही तर सर्वसाधारण सभेतही पदाधिकारी निवडता येणार, असा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. 

सरकारकडे या किचकट प्रक्रियेविरुद्ध अनेक तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत हा निर्णय घेण्यात आलाय.