LOCमध्ये भाजपकडून खोटा हल्ला : संजय निरुपम

भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करत कारवाई केली.मात्र, भाजप सरकारने खोटा हल्ला घडवून आणला, असा थेट आरोप काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मोदी सरकारवर केला आहे. 

Updated: Oct 4, 2016, 01:20 PM IST
LOCमध्ये भाजपकडून खोटा हल्ला : संजय निरुपम title=

मुंबई : भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करत कारवाई केली. यात 30 ते 35 दहशतवादी ठार झाल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. मात्र, भाजप सरकारने खोटा हल्ला घडवून आणला, असा थेट आरोप काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मोदी सरकारवर केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले.

दरम्यान, सर्जिकल स्ट्राइकचे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वागत केले. मोदी यांनी अडीच वर्षांतमध्ये चांगले काम केले, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली होती.

भाजपने फेक हल्ला घडवून आणला आहे. भाजपचा हा बनाव आहे, असे ट्विट संजय निरुपम यांनी केला आहे. पाकिस्तानवर खरा हल्ला हवा आहे, असे पुढे निरुपम यांनी म्हटले आहे.