भारत अंडर 19 वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये

अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारताची विजयी घौडदौड सुरुच आहे.

Updated: Jan 30, 2016, 05:29 PM IST
भारत अंडर 19 वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये title=

मिरपूर: अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारताची विजयी घौडदौड सुरुच आहे. मिरपूरमध्ये न्यूझिलंडविरुद्ध झालेल्या वनडेत भारताचा 120 रननं विजय झाला आहे. त्यामुळे भारत वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला आहे.
259 रनचा पाठलाग करताना न्यूझिलंडची अवस्था 4 आऊट 16 झाली होती. या चारही विकेट भारताचा फास्ट बॉलर अवेश खाननं घेतल्या.

अवेशनं दिलेल्या या धक्क्यानंतर मात्र न्यूझिलंडचा संघ सावरू शकला नाही, आणि 32 व्या ओव्हरमध्ये भारतानं हा सामना जिंकला. या सामन्यात महिपाल लोमरोरची ऑल राऊंड कामगिरी पाहायला मिळाली. त्यानं या मॅचमध्ये 5 विकेट तसंच 45 रनही केल्या.

 
टॉस जिंकून न्यूझिलंडनं भारताला पहिले बॅटिंग दिली. पण सुरवातीलाच भारताची 19 रनवर 2 विकेट अशी दयनीय अवस्था झाली. पण त्यानंतर रिषभ पंत आणि सरफराज खान यांच्या 89 रनच्या पार्टनरशिपमुळे भारताचा डाव सावरला. पंतनं 83 बॉलमध्ये 57 तर सरफराजनं 80 बॉलमध्ये 74 रन केल्या.

हे दोघं आऊट झाल्यानंतर अरमान जाफर(46) आणि लोमरोरनं (45) भारताला 258 रन पर्यंत पोहोचवलं.