ओरिजनल बॅटरी घेताय तर सावधान...

600 रूपयांत विकत घेतलेल्या बॅटरीत दोष निर्माण झाल्याने संपूर्ण मोबाईल जळून गेल्याची घटना ठाण्यात घडली. 

Updated: Jul 28, 2016, 08:54 AM IST
ओरिजनल बॅटरी घेताय तर सावधान... title=

ठाणे : 600 रूपयांत विकत घेतलेल्या बॅटरीत दोष निर्माण झाल्याने संपूर्ण मोबाईल जळून गेल्याची घटना ठाण्यात घडली. 

ओरिजिनल म्हणून ही बॅटरी घेतली होती. ठाण्यातल्या एका कार्यालयात सुरेश साळवे नावाच्या व्यक्तीचा हा मोबाईल होता. 

मोबाईलमध्ये 600 रूपयांची बॅटरी घातल्यानंतर तो चार्जिंगला लावला असता मोबाईलमधून धूर येऊ लागला. संपूर्ण कार्यालयात धूर झाला. क्षणार्धात हा मोबाईल जळून गेला.