"मैदानावर विराट कोहलीने जरा भान ठेवून वागलं पाहिजे"

 मैदानावर कोहलीचा आक्रमक अंदाज अनेकांनी पाहिला असेल.

Updated: Jul 13, 2021, 01:10 PM IST
"मैदानावर विराट कोहलीने जरा भान ठेवून वागलं पाहिजे" title=

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मैदानात आक्रमक भूमिकेसाठी ओळखला जातो. मैदानावर कोहलीचा आक्रमक अंदाज अनेकांनी पाहिला असेल. याशिवाय विरोधी टीमची विकेट पडतानाही तो अत्यंत आक्रमकपणे तो क्षण साजरा करतो. इतकंच नाही तर अशावेळी त्याच्या तोंडातून निघणारे अपशब्द देखील कॅमेरामध्ये कैद झालेत. याचवरून एका माजी क्रिकेटरने विराट कोहलीचे कान टोचले आहेत.

भारताचे माजी विकेटकीपर दीप दासगुप्ता यांनी विराट कोहलीला खास सल्ला दिला आहे. मैदानावर कर्णधार विराट कोहलीने जर समजून वागलं पाहिजे असं दीप दासगुप्ता यांनी मत व्यक्त केलं आहे.

दीप दासगुप्ता यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर म्हटलं आहे की, कोहलीची मैदानावरील ताकद त्याला पुढे आणण्यास मदत करतेय. परंतु तो ओळखीच्या लोकांसाठी शांत व्यक्तींपैकी एक आहे. 

दीप दासगुप्ता पुढे म्हणाले, "विराट कोहलीने मैदानावर सावधगिरी बाळगली पाहिजे. खासकरून तो मैदानावर करत असलेले इशारे आणि शब्दांबद्दल विराटने काळजी घेणं गरजेचं आहे. मला माहित आहे की तो अनेकदा मैदानावर अग्रेसिव्ह वाहून गेले आहेत. अनेक लहान मुलं आहेत जी विराट कोहलीला पाहतात. आणि लाखो मुलांसाठी तो एक आदर्श आहे."