12 ceasefire violations

शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला भारताचा इशारा

सीमेवर पाकिस्तानकडून कुरापती सुरुच आहेत. पाकिस्तान एलओसीवर सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तान चवताळला आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान जम्मू-कश्मीरच्या सीमाभागात सतत फायरिंग करत आहे. पाकिस्तानी सेना भारतीय जवानांना निशाना बनवत आहेत. गावातील भागांना देखील पाकिस्तान सैन्याकडून निशाना बनवण्यात येत आहे. भारताने आता पाकिस्तानला या विरोधात एक पत्र दिलं आहे.  2 आणि 9 नोव्हेंबरनंतर या महिन्यात तिसऱ्यांदा विरोध पत्र देण्यात आलं आहे. सीमापलिकडे पाकिस्तानच्या चौक्यांजवळ दहशतवादी देखील जमत असल्याचं भारताने नमूद करत त्याची निंदा केली आहे.

Nov 17, 2016, 10:58 PM IST