gorakhpur hospital tragedy

गोरखपूरची घटना सामुदायिक बालहत्याकांडच - उद्धव ठाकरे

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याने तब्बल ७० मुलांचा नाहक बळी गेला आहे. मात्र इतक्या धक्कादायक घटनेवर यूपी सरकार मौन बाळगून आहे. अशात शिवसेनेने या घटनेवरून यूपी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. उत्तर प्रदेशमधील गोरखपूरच्या इस्पितळातील ७० मुलांचे मृत्यू म्हणजे सामुदायिक बालहत्याकांडच आहे, ही गरिबीची विटंबना आहे. असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

Aug 14, 2017, 09:30 AM IST