-
-
महानगरांमध्ये चार भिंतीत समाजाशी असलेलं नातं दिवसेंदिवस कमी होत असल्याच समोर आलं आहे. मुलाकडूनच आईप्रती घडलेली घटना ही अतिशय धक्कादायक आहे. 3 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या आईचा मृतदेह मुलाने आपल्या फ्रिजमध्ये ठेवल्याची धक्कादायक घटना घडली.
वीस वर्ष जुन्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपुर कोर्टाने आज सलमान खानला दोषी ठरवलं आहे. या प्रकरणात सलमान खानला 6 वर्षाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. या प्रकरणातील सह दोषी असलेल्या 5 कलाकारांची निर्दोष सुटका केली आहे. सलमान खानच्या चाहत्यांना ही सर्वात मोठी धक्का देणारी बातमी आहे.
20 वर्षापूर्वी घडलेल्या काळवीट शिकार प्रकरणाबाबत आज जोधपुर कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. अभिनेता सलमान खानला कोर्टाने दोषी ठरवलं असून इतर 5 कलाकारांना निर्दोष मुक्त केलं आहे. या प्रकरणातून सलमान खान तुरूंगात जाण्यापासून वाचून शकतो. मात्र यासाठी एक सर्वात मोठी अडचण आहे.
राजस्थानमधील बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणात मुख्य आरोपी अभिनेता सलमान खानच्या शिक्षेची आज सुनावणी होणार आहे. या प्रकरणात सीजेएम ग्रामीण देवकुमार खत्रीने 4 फेब्रुवारीमध्ये संपूर्ण प्रकरणाच वाचन झाल्यानंतर त्याला सुरक्षित असल्याच म्हटलं आहे.
20 वर्षानंतर चर्चेत असलेल्या काळवीट शिकार प्रकरणात आज महत्वाचा निर्णय होणार आहे. सलमान खानसोबत इतर 5 कलाकार आज जोधपुर कोर्टात उपस्थित राहणार आहे. यावेळी अभिनेत्री तब्बू देखील जोधपुर एअरपोर्टवर पोहोचली. तेव्हा तिच्या छेडछाडीला सामोरे जावे लागले.
गुरूवारी काळवीट शिकार प्रकरणातील महत्वाचा निर्णय जोधपुर न्यायालय सुनावणार आहे. या प्रकरणात सलमान खानसोबतच आणखी 5 कलाकारांबाबत महत्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. सलमानसोबत सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम या कलाकारांबाबत काय होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. हे पाचही जण जोधपुरला पोहोचले आहेत.
देशात महिलांविरोधात होणाऱ्या घटना थांबायचे काही नाव घेत नाहीत. पंजाबमध्ये असाच एक प्रकार घडला आहे ज्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आणि ही घटना माजी आमदाराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रकार घडला आहे. या प्रकरणाचा आरोप तिच्याच परिसरातील एका कपडा व्यापारी बाप - मुलावर लावला आहे.
एप्रिलमध्ये इंडियन प्रीमिअर लीगच्या 11 व्या सिरीजला सुरूवात झाली आहे. जवळपास 2 महिने सुरू असणाऱ्या या सिझनची पहिली मॅच 7 एप्रिलला होणार आहे. या दिवशी गेल्यावर्षीची विजेती टीम मुंबई इंडियन्स चैन्नई सुपर किंग्सविरूद्ध खेळणार आहे. हा सामना वानखेडेमध्ये होणार आहे.
आधुनिक जीवनशैलीमुळे मातीची भांडी हळूहळू हद्दपार झाली. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुन्हा एकदा मेट्रो शहरांमध्ये पुन्हा एकदा दिसू लागली आहेत. जुनी जानती मंडळी आज देखील मातीच्या भांड्यात जेवण बनवणं पसंद करत आहेत. आयुर्वेदात असं म्हणमं आहे की, आगीवर हळूहळू जेवणं शिजणं शरीरासाठी हितकारक आहे. मात्र स्टील आणि एल्युमिनिअममधील अन्न हे शरीरासाठी हानिकारक आहे.
दादासाहेब फाळकेंनी एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला . त्यांचा वारस सांगणारे मराठीतील कलाकार अत्याधुनिक तंत्रज्ञानाने चित्रपट प्रदर्शित करु पाहत आहे ही मराठी प्रेक्षकांसाठी अभिमानास्पद बाब ठरावी. ही अभिमान वाटणारी कामगिरी घडवून आणणार आहे ‘लव्ह-लफडे’ नावाचा चित्रपट. मोबाईल ऍपद्वारे जगभर प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट होय.