नेमकं काय बिनसलं? लग्नाआधी शमिताने राकेशकडे केली 'ही' मागणी !

राकेश आणि शमिताच्या नात्यात नेमकं काय बिनसलं? लग्नाआधी अभिनेत्रीने केलेली मागणी राकेश करेल पूर्ण?  

Updated: Mar 13, 2022, 09:16 AM IST
नेमकं काय बिनसलं? लग्नाआधी शमिताने राकेशकडे केली 'ही' मागणी ! title=

मुंबई : कोणत्याही नात्यात भांडणं होतचं असतात. काही वाद असे असतात ज्यामुळे नाती आणखी घट्ट होतात, तर काही वाद असे असतात, ज्यामुळे नात्यात कायमचा दुरावा निर्माण होतो. सध्या अभिनेत्री शमिता शेट्टी आणि अभिनेता राकेश बापट यांच्या नेमकं काय बिनसलं आहे? ज्यामुळे फक्त आणि फक्त त्याच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या आहेत.

राकेश आणि शमिता यांच्यात प्रेमाचा गुलाब 'बिग बॉस' ओटीटीच्या घरात फुलला. त्यानंतर दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण आता त्यांच्या वाद सुरू असल्याचं समोर आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यांच्यातील वादाचं नक्की कारण काय? 
मिळालेल्या माहितीनुसार शमिता राकेशला मुंबईत शिफ्ट होण्यासाठी सांगत आहे. दरम्यान, राकेशचं रिद्धी डोगरासोबत घटस्फोट झाल्यानंतर राकेश पुण्यात शिफ्ट झाला.... या कारणामुळे दोघांमध्ये वाद सुरू असल्याचं समोर येत आहे.

पण आता शमिता त्याला पुन्हा मुंबईत येण्यासाठी सांगत आहे. त्यामुळे राकेश शमिताची मागणी पूर्ण करतो की, नाही हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. बीग बॉस ओटीटी' शोच्या माध्यमातून एकमेकांच्या जवळ आलेले शमिता शेट्टी आणि राकेश बापट कायम त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात.