अपूर्वा-शशांकचा शुभविवाह संपन्न, आता थाटणार संसाराची रांगोळी

या दोघांचं लग्न पार पडलं आहे.

Updated: Jan 27, 2022, 07:18 PM IST
 अपूर्वा-शशांकचा शुभविवाह संपन्न, आता थाटणार संसाराची रांगोळी title=

मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत शशांक आणि अपूर्वाच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. कानेटकर आणि वर्तक कुटुंबाने लग्नाची जय्यत तयारी केली असून या लग्नसोहळ्यात अनेक मालिकांमधील कलाकार उपस्थित राहणार आहेत.

लग्नसोहळा म्हटलं की, आपल्या परिवाराशिवाय तो पूर्णच होत नाही. त्यामुळेच या खास सोहळ्यात स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार उपस्थित होता. केळवण, मेहेंदी आणि हळद थाटात पार पडल्यानंतर आता लग्नाचा शाही थाट अनुभवण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. नुकताच या मालिकेनं 100 भागांचा टप्पाही पूर्ण केला आहे.

जिलेबीसारखा गोडवा जपणारा शशांक आणि लवंगी मिरचीप्रमाणे ठसक्याला आणि चवीला कमी नसणारी अपूर्वा या दोघांचं लग्न पार पडलं आहे.

दोघांचे स्वभाव परस्परविरोधी असले तरी दोघांना एकत्र जोडून ठेवणारा दुवा म्हणजे कुटुंबावरचं प्रेम. याच कुटुंबावरच्या  प्रेमाने दोघांना एकत्र यायला भाग पाडलं आहे. लग्न म्हणजे दोन मनांचं नाही तर दोन कुटुंबांचं मिलन असतं.

एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्व अधोरेखित करणाऱ्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतला हा विवाहसोहळा फक्त वर्तक आणि कानेटकर परिवारच नाही, तर संपूर्ण प्रवाह परिवार साजरा करणारा आहे. लवकरच हा सोहळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.