'आता काही झालं तर सरकारनं तयारी ठेवावी'; 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा मनोज जरांगेंना पाठिंबा

Actress supports Manoj Jarange Patil Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाला 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अभिनेत्रीनं पाठिंबा दिला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 30, 2023, 06:13 PM IST
'आता काही झालं तर सरकारनं तयारी ठेवावी'; 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा मनोज जरांगेंना पाठिंबा title=
(Photo Credit : Social Media)

Actress supports Manoj Jarange Patil Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण हा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे. जसे दिवस जात आहेत तसा हा मुद्दा चिघळत चालला आहे. महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील उपोषण करत असताना त्यांची तब्येच अचानक खालावल्यानं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यात बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख, मराठमोळा अभिनेता किरण माने यांची नावं आहेत. तर आता 'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिनेत्रीनं देखील त्यांना पाठिंबा दिला आहे. चला जाणून घेऊया काय म्हणाली ही अभिनेत्री...

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेनं मनोज जरांगे-पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. अश्विनीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं मनोज जरांगे-पाटील यांचा एक फोटो शेअर करत कॅप्शन दिलं आहे की 'एक मराठा लाख मराठा...आणि पाटील साहेबांना काही झाले तर सरकारने त्याचीही तयारी ठेवा मग. आता आमच्यावर नुसते लाठीचार्ज करून उपयोग होणार नाही.' अश्विनीनं केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. 

हेही वाचा : मनोज जरांगे-पाटलांच्या प्रकृतीची रितेश देशमुखला चिंता! म्हणाला, 'त्यांच्या तब्येतीसाठी मी...'

Marathi Actress aai kuthe kay karte fame supports Manoj Jarange Patil Maratha Reservation

काय आहे मनोज जरांगे-पाटील यांची मागणी?

मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी आज घोषणा केली की कुणबी पुरावे ज्यांच्याकडे आहेत त्यांना उद्यापासून कुणबी असल्याचे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात होईल. यावर मनोज जरांगे-पाटील यांनी सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या असं म्हणतं सरकारचा हा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यांचं म्हणणं आहे की सर्व मराठी हे एकच आहेत. त्यात अर्धे वेगळे आणि अर्धे वेगळं असं नाही, तर जो पर्यंत महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही असं मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटले आहे. सरकारने आमचं शांततेलं आंदोलन पाहिलं आहे. आता आंदोलनचा तिसरा टप्पा  1 नोव्हेंबरपासून सुरु होईल मग तर तर त्यांना बैठकाही घेता येणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.