गरीबांची वाट लावणारं सरकार, सुप्रिया सुळे यांची आक्रोश मोर्चात टीका

केंद्र आणि राज्य सरकारच्या अनागोंदी कारभाराचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दापोलीत आक्रोश मोर्चा काढला. खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली.

Updated: Nov 16, 2017, 09:18 PM IST
गरीबांची वाट लावणारं सरकार, सुप्रिया सुळे यांची आक्रोश मोर्चात टीका title=

रत्नागिरी : केंद्र आणि राज्य सरकारच्या अनागोंदी कारभाराचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दापोलीत आक्रोश मोर्चा काढला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. या मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यावेळी गरीबांची पर्वा नसणारे आणि वाट लावणारे हे सरकार आहे, अशी टीका सुळे यांनी केली.

सरकारविरोधात घोषणाबाजी

जीएसटी, नोटाबंदी, कर्जमाफी, महागाई यासह विविध मुद्यांवरुन सरकारला घेरण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसंच सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढण्यात आली. 

जनतेच्या समस्यांबात देणेघेणं नाही!

शेवगावमध्ये झालेला शेतकऱ्यांवरील गोळीबार हा दुर्दैवी असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली. सरकार जाहिराबाजी करण्यात धन्यता मानत असून जनतेच्या समस्यांबात देणेघेणं नसल्याचा आरोपही सुळे यांनी केला.