फटाक्याच्या कारखान्यावर वीज कोसळली, 8 ठार

 जिल्ह्यात फटाक्यांच्या कारख्यान्यावर वीज कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. कळंब तालुक्यातील तिरखेडा गावातील ही घटना आहे. फटाके बनवणाऱ्या 2 कारखान्यांवर वीज कोसळली आणि यात  8 जणांचा मृत्यू झाला.

Updated: Jul 8, 2014, 10:48 PM IST
फटाक्याच्या कारखान्यावर वीज कोसळली, 8 ठार title=

उस्मानाबाद :  जिल्ह्यात फटाक्यांच्या कारख्यान्यावर वीज कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. कळंब तालुक्यातील तिरखेडा गावातील ही घटना आहे. फटाके बनवणाऱ्या 2 कारखान्यांवर वीज कोसळली आणि यात  8 जणांचा मृत्यू झाला.

तसेच यात आणखी 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. वेलकम फायर वर्क्स आणि प्रिन्स फायर वर्क्स असं या फटाका कारखान्यांची नावं आहेत. नदीला पूर आल्याने मदतकार्यात मोठा अडथळा येत असल्याचं सांगण्यात येत आहे.
 
कारखान्याच्या इमारतीखाली आणखी काही जण अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. स्थानिक लोकांनी मदत कार्य केलं आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.