'मुंबई न तुंबल्याची दखल कोणीच घेतली नाही'

यंदा मुंबई तुंबली नाही याची कोणीही दखल घेतली नाही. याचबरोबर गेल्यावर्षी डेंग्यूची जी भयानकता होती ती भयानकता यावर्षी दिसली नाही याचं श्रेय मुंबई महापालिकेला द्यावं लागेल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Updated: Dec 11, 2016, 08:07 PM IST
'मुंबई न तुंबल्याची दखल कोणीच घेतली नाही' title=

मुंबई : यंदा मुंबई तुंबली नाही याची कोणीही दखल घेतली नाही. याचबरोबर गेल्यावर्षी डेंग्यूची जी भयानकता होती ती भयानकता यावर्षी दिसली नाही याचं श्रेय मुंबई महापालिकेला द्यावं लागेल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय’ नामकरण आणि लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते हा लोकापर्ण सोहळा पार पडला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडेंसह अनेक मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते.