तिसऱ्या कसोटी सामन्यात भारत सहाशेपार

भारताने बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या एकमेव कसोटीत पहिल्या डावात ६००हून अधिक धावांचा डोंगर उभारलाय. भारताचा हा सलग तिसरा कसोटी सामना आहे ज्यात भारतीय संघाने एका डावात ६००हून अधिक धावा केल्यात.

Updated: Feb 10, 2017, 03:17 PM IST
तिसऱ्या कसोटी सामन्यात भारत सहाशेपार title=

हैदराबाद : भारताने बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या एकमेव कसोटीत पहिल्या डावात ६००हून अधिक धावांचा डोंगर उभारलाय. भारताचा हा सलग तिसरा कसोटी सामना आहे ज्यात भारतीय संघाने एका डावात ६००हून अधिक धावा केल्यात.

यासोबतच असे करणारा भारतीय संघ पहिला संघ ठरलाय. भारताने डिसेंबर २०१६मध्ये चेन्नईमधील इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत ७५९ धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर मुंबईतील इंग्लंडविरुद्ध ६३१ धावा केल्या होत्या.

त्यानंतर आता हैदराबादमध्ये सुरु असलेल्या सामन्यातही भारताने ६०० पार धावसंख्या उभारण्याची किमया साधलीये.