भारत-इंग्लंड वनडे सीरीज रद्द होण्याची शक्यता, हे आहे कारण

वनडे मालिका रद्द होण्याची शक्यता

Updated: Mar 17, 2021, 07:46 PM IST
भारत-इंग्लंड वनडे सीरीज रद्द होण्याची शक्यता, हे आहे कारण title=

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात टी -२० सिरीजनंतर वनडे मालिका खेळली जाणार आहे. तीन सामन्यांची मालिका पुण्यात होणार आहे, मात्र त्यावर आता धोक्याचे ढग दिसू लागले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी सर्व वयोगटातील घरगुती स्पर्धा रद्द केल्या आहेत. कोरोना साथीच्या आजाराची वाढती घटना लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

बीसीसीआयने सध्या सर्व वयोगटातील सामने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आगामी वीनू मांकड ट्रॉफीचा समावेश आहे. सध्या भारतात कोरोनाची प्रकरणे अचानक वाढू लागली आहेत. या कारणास्तव, इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सत्रात पहिल्या काही दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाची प्रकरणे समोर येत आहेत, अशा परिस्थितीत भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिका होणार का याबाबत शंका आहे.

जगात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर लॉनडाउनची परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक सामने रद्द झाले. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. ज्यामुळे क्रिकेट सामन्यांवर पुन्हा एकदा संकट आलं आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकार देखील आता सतर्क झाली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत ३ सामने झाले आहेत. ज्यामध्ये इंग्लंडने 2-1 ने आघाडी घेतली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हे सामने रंगत आहे. या ठिकाणी देखील प्रेक्षकांची मोठी गर्दी झाल्यानंतर प्रशासनाने काही कठोर निर्णय घेतले.