गावाचं पाणी केलं बंद

विरोधकांना मतदान केल्यानं गावाचं पाणी केलं बंद

विरोधकांना मतदान केल्यानं गावाचं पाणी तोडल्याचा धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. बोर्ली ग्रामपंचायतीनं हा तालीबानी कारभार चालवला आहे. जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत मुरुड तालुक्यातील बोर्ली मांडला गावाजवळच्या ताराबंद इथल्या मतदारांनी विरोधकांना मतदान केलं. याचा राग धरत या गावला भारत निर्माण योजनेतून मिळणारं पाणीच बोर्ली ग्रामपंचायतीनं बंद करुन टाकलं.

Feb 27, 2017, 04:48 PM IST