वर्ध्यात प्रसादातून १८५ भाव़िकांना विषबाधा

वर्ध्यात प्रसादातून १८५ भाव़िकांना विषबाधा

वर्धा जिल्ह्यातील आंजी गावात अनुसुया माता मंदिरातमहाप्रसादातून १८५ भाव़िकांना विषबाधा झालीय. वार्षिक कार्यक्रमाच्या निमीत्तानं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. जेवणातील बासुंदी मधून विषबाधा झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांची स्थिती सध्या स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Apr 14, 2012, 02:07 PM IST