2611 mumbai terror attack

२६/११ हल्ल्यातील शहिदांना मुंबईत श्रद्धांजली

२६-११ च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नागरिक, शहीद झालेले पोलीस आणि जवानांना आज मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच देशातही श्रद्धांजली वाहण्यात आली. मुंबईवरील हल्ल्याला आज चार वर्षे पूर्ण झाली आहेत.

Nov 26, 2012, 09:46 AM IST

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर....

भारतात पुन्हा हल्ले करण्याची दर्पोक्ती पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटनांनी केलीय. २६-११ ला चार वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज मुंबईसह देशभर सुरक्षा वाढवण्यात आलीय. तसंच मुंबईत शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलंय.

Nov 26, 2012, 09:03 AM IST

२६/११ हल्ला : मुंबईच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह?

२६-११ दहशतवादी हल्ल्यानं मुंबईच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. सुमारे ८० तास दहशतवादी मुंबईला वेठीस धरुन होते. हा हल्ला इतका भीषण होता की, मुंबई पोलीसही हतबल झाले होते. दहशतवाद्यांना संपवण्यासाठी एनएसजीला पाचारण करावं लागलं. या हल्ल्यानंतर सुरक्षेसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मात्र आज तरी मुंबईनगरी पूर्णपणे सुरक्षित आहे का, हा प्रश्नच आहे.

Nov 26, 2012, 08:41 AM IST