First Airport of India : भारतातील खेडीगावांना एकमेकांशी जोडण्यासाठी बस वाहतुक आहे. त्यासोबत रेल्वेचे मोठे जाळे भारतात पसरलंय. यात सर्वात जलद गतीने पण सर्वात महाग प्रवास हा विमानाचा आहे. भारतात मोठे संख्येने दररोज लोक विमानाने प्रवास करतात. भारतात आज मोठं मोठ्या शहरांमध्ये विमानतळ असून आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळ आहेत. पण भारतातील पहिलं विमानतळ कुठे बांधण्यात आले आणि कुठल्या वर्षी पहिलं विमान उडालं याबद्दल तुम्हाला माहितीये का? तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की भारतातील पहिलं विमानतळ हे महाराष्ट्रातील शहरात आहे. आज आपण या विमानतळाबद्दल जाणून घेणार आहोत.
मीडिया रिपोर्टनुसार देशात कमर्शियल फ्लाइट्सची सुरुवात JRD टाटा यांनी केली होती. त्यांनी देशातील पहिलं नागरिक उड्ड्यान विमानतळाची स्थापना ही महाराष्ट्रातील मुंबई शहरात केली होती. ज्याचं नाव जुहू एयरोड्रोम आहे. याची स्थापना 1998 मध्ये झाली असून 1932 मध्ये जेआरडी टाटा इथे पहिली फ्लाइंट उतरवण्यात आलं होतं. ही पहिली अनुसूचित कमर्शियल मेल सर्व्हिस होती आणि ते कराची इथून मुंबईला आले होते. दुसऱ्या महायुद्धात या विमानतळाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. ब्रिटिश लष्कराच्या आशियातील हवाई कारवायांना इथेच बरीच मदत मिळाली होती.
हे विमानतळ अजुनही सुरु असून इथे 2 रनवे ऑपरेशनल आहेत. या विमानतळावरून नेते किंवा मंत्र्यांसह इतर व्हीआयपींची विमाने उतरवली जातात. यासोबतच इथून हेलिकॉप्टरही उड्डाण भरतात. या विमानतळाच वैशिष्ट्य म्हणजे बॉम्बे फ्लाइंग क्लब पायटलला प्रशिक्षणही देण्यात येतं. हे विमानतळ दिल्लीच्या पालम विमानतळासारखेच काम करतं.
पूर्वी विमानांचा वापर युद्धासाठी केला जात होता, मात्र हळूहळू तंत्रज्ञान विकसित झालं आणि आता ते प्रवास व्यवसायातही वापरण्यास सुरुवात झाली. विमान प्रवासातून लोकांचा बराच वेळ वाचतो. इतर माध्यमांच्या तुलनेत ते थोडे महाग आहे.