तब्बल 41 वर्षे कठोर ब्रह्मचर्य, त्यानंतर सात्विक भोजन...; भारतातील 'हे' मंदिर म्हणजे अनेक रहस्यांचं ठिकाण

Mystery of Indian Famous Temple : भारतातील बहुविध राज्यांमध्ये अशी अनेक ठिकाणं, अशी अनेक तीर्थक्षेत्र आहेत जिथं आजही काही रहस्यांचा उलगडा होऊ शकलेला नाही. 

सायली पाटील | Updated: Feb 13, 2025, 03:24 PM IST
तब्बल 41 वर्षे कठोर ब्रह्मचर्य, त्यानंतर सात्विक भोजन...; भारतातील 'हे' मंदिर म्हणजे अनेक रहस्यांचं ठिकाण  title=
Sabarimala 41 days of celibacy and satvik food before darshan secrets of this indian temple revealed

Mystery of this Indian Famous Temple : रहस्य... पृथ्वीवर कैक अशी रहस्य आहेत ज्यांचा उलगडा आजपर्यंत झालेला नाही. काही रहस्य तर अशी आहेत जिथं खुद्द संशोधक आणि अभ्यासकांनीसुद्धा प्रचंड मेहनत घेतली. पण, त्यांच्या हाती निशाराच लागली. दक्षिण भारतातही एक असंच मंदिर आहे, ज्याभोवती अनेक रहस्यांचं वलय असून, काही रहस्यांमागची मुख्य कारणं अद्यापही समोर आलेली नाहीत. 

हे आहे केरळातील शबरीमाला मंदिर. दक्षिण भारतातील केरळ राज्यात असणारं शबरीमाला मंदिर प्रचंड रहस्यमयी असून, तिथं भगवान अय्यप्पा यांची आराधना केली जाते. कोणालाही सहजासहजी भगवान अय्यप्पा यांचं दर्शन घेता येत नाही. इथं पोहोचण्यासाठी 41 दिवसांचं कठोर ब्रह्मचर्य आणि त्यानंतर सात्विक भोजन अशा नियमांचं पालन करावं लागतं. 

चारही बाजूंनी या मंदिराला डोंगररांगांचा वेढा असून, मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी 8 पवित्र पायऱ्या चढून यावं लागतं. या प्रत्येक पायरीचा एक वेगळा अर्थ आहे. 

पहिल्या पाच पायऱ्या मानवाच्या पंचेंद्रियांचं प्रतीक आहेत. यानंतरच्या 8 पायऱ्या मानवी भावनांशी संलग्न असल्याचं म्हटलं जातं. तर, उर्वरित तीन पायऱ्या मानवी गुण आणि त्यानंतरच्या दोन पायऱ्या ज्ञान, अज्ञानाचं प्रतीक आहेत. 

हेसुद्धा वाचा : समुद्रातील राक्षस पाहताच संशोधकांना भरली धडकी; Video शेअर करत जवळून दाखवला विचित्र जीव 

मंदिरांची चर्चा चमत्कारांमुळेच जास्त... 

शबरीमाला मंदिर हे तिथं असणाऱ्या काही चमत्कारिक गोष्टींसाठीही ओळखलं जातं. असं म्हणतात की, मकर संक्रांतीच्या काळोख्या राच्री इथं अनेकदा डोंगररांगांमध्ये वेळोवेळी एक पेटती ज्योत पाहायला मिळते. हीच ज्योत पाहण्यासाठी जगभरातून भाविक येतात, इथं येणाऱ्यांची अशी धारणा आहे की या ज्योतीच्या रुपात खुद्द भगवान अय्यप्पा भक्तांना दर्शन देतात. काहींच्या मते जेव्हा ही ज्योत दिसते तेव्हा एक आवाजही ऐकू येतो. अशा या मंदिरात येताना पुरुष मंडळी अनेकदा काळी वस्त्र परिधान करतात. प्रचंड खडतर प्रवास करून भाविक इथवर पोहोचतात आणि येथील वातावरण पाहून भारावून जातात.