Precautions to Avoid GBS: पुण्यातून सुरू झालेल्या गिया बार्रेचे रुग्ण आता राज्यभरात आढळतायेत. दुषित पाण्यामुळे या आजाराचा धोका असल्याचं सांगितलं जात होतं.मात्र आता चिकनमुळेही जीबीएसचा आजार होऊ शकतो असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय. त्यामुळे चिकन पुर्ण शिजवून सोबतच चिकन घेताना काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय.
पुण्यासह कोल्हापूरपर्यंत तर नागपूरपासून मुंबईपर्यंत गिया बार्रे सिंड्रोम म्हणजे जीबीएसच्या आजाराचा धोका वाढलाय. जीबीएसनं आतापर्यंत अनेकांचा बळी घेतलाय. तर कित्येकजण जीबीएसशी रुग्णालयात झुंज देतायेत. सुरुवातीला जीबीएस हा दूषित पाण्यामुळं होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. जीबीएसचा उद्रेक झालेल्या पुण्यातल्या नांदेड सिटी भागातल्या एका विहिरीतल्या पाण्यावर उगाचच संशय घेण्यात आला होता. पण आता सरकारी यंत्रणांनी वेगळाच दावा केलाय. जीबीएस हा अर्धवट शिजवलेल्या चिकनमुळं झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय. चिकन खाणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात कमी नाही. रोज हजारो किलो चिकन महाराष्ट्रातली जनता फस्त करते. सरकारच्या या दाव्यामुळं चिकन खाताना योग्य ती काळजी घेण्याची गरज निर्माण झालीये.
चिकन सेंटरमध्ये सदृढ कोंबड्या आणल्यात का याची खात्री करा. स्वच्छ मांस आपण विकत घेतो याची दक्षता घ्या.घरी आणलेलं मांस 100 अंश सेल्सियस तापमानावर शिजवून घ्या. अर्धवट शिजवलेलं मांस किंवा चिकन खाऊ नका.जीबीएस चिकनमुळं पसरला असला तरी त्यासाठी पोल्ट्रीमधील कोंबड्यांची कत्तल करण्याची गरज नसल्याचं सरकारचं म्हणणं आहे.
महाराष्ट्रात चिकन खाणा-यांची संख्या कोटींच्या घरात आहे. त्यातच चिकनच्या माध्यमातून जीबीएस सारखे आजार पसरल्याचं समोर आलंय. त्यामुळं घाबरून न जाता आपण खातोय ते चिकन योग्य प्रक्रिया केलेलं आहे का याची खात्री करा. अन्यथा जीबीएस सारख्या आजारांचा तुम्हाला सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.