'टीकेसाठी मुद्दा शोधणं आणि टीका करणं हाच सध्या विरोधी पक्षाचा अजेंडा'

लोकशाहीत विरोधी पक्षावर खूप मोठी जबाबदारी असते, पण...

Updated: Sep 10, 2020, 10:22 AM IST
'टीकेसाठी मुद्दा शोधणं आणि टीका करणं हाच सध्या विरोधी पक्षाचा अजेंडा' title=

मुंबई : 'लोकशाहीत विरोधी पक्षावर खूप मोठी जबाबदारी असते. पण फक्त टीका करायला एखादा मुद्दा सापडतो का? याचा शोधं घेणं आणि फक्त टीका करणं हा एकच अजेंडा सध्या विरोधी पक्षाचा दिसतोय', अशी टीका राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

'लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षाप्रमाणे विरोधी पक्षावर देखील खूप मोठी जबाबदारी असते. सरकार कुठं कमी पडत असेल तर त्या गोष्टी सरकारच्या लक्षात आणून देऊन विरोधी पक्ष आपली भूमिका सक्षमपणे पार पडू शकतात. राजकीय पक्ष राजकारण करणारच, पण राजकारण करण्याचीही एक योग्य वेळ असते, आणि त्याचं भान ठेवणंही गरजेचं असतं, असंही त्यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे नमूद केलं आहे. 

लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षाप्रमाणे विरोधी पक्षावर देखील खूप मोठी जबाबदारी असते. सरकार कुठं कमी पडत असेल तर त्या गोष्टी...

Posted by Rohit Rajendra Pawar on Wednesday, September 9, 2020

विधानभवनात विरोधकांनी केलेल्या टीकेवर काय बोलले?

नुकत्याच झालेल्या अधिवेशनात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून केलेलं आंदोलन बघितलं, विरोधी पक्षाचे सदस्य काय घोषणा देत असतील तर, घरी बसवून सरकार चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा निषेध! हे योग्य नाही. पंतप्रधानही कार्यालयात बसून कामकाज करतात, पण त्यांच्यावर आम्ही टीका केली नाही आणि करतही नाही.

टीका करणं हा एकच अजेंडा

टीका करायला एखादा मुद्दा सापडतो का याचा शोध घेणं आणि फक्त टीका करणं हा एकच अजेंडा सध्या विरोधी पक्षाचा दिसतोय. याबाबतचं एक उदाहरण सांगतो, चार-पाच दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या #DPIIT विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या व्यवसाय सुधार कृती आराखड्या (#BRAP) अंतर्गत Ease of Doing Buissness २०१९ चं राज्यांना देण्यात आलेलं रँकिंग जाहीर करण्यात आलं. या रँकिंगमध्ये महाराष्ट्र तेराव्या क्रमांकावर आहे. याबाबत राज्याच्या विरोधी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी फेसबुकवर विस्तृत पोस्ट लिहून राज्य सरकारवर टीका केली.