बाभळगाव ते बाभळगाव,

महाराष्ट्राचा लाडका नेता असलेल्या विलासराव देशमुखांना आज तमाम देशवासियांनी अखेरचा निरोप दिला. ज्या बाभळगावातून त्यांची कारकिर्द सुरु झाली, त्याच बाभळगावात लाखोंच्या जनसमुदायानं साश्रू नयनांनी त्यांना अलविदा केला. विलासरावांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेतला आहे, बाभळगाव ते बाभळगावमध्ये.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 15, 2012, 10:21 PM IST

www.24taas.com,मुंबई
महाराष्ट्राचा लाडका नेता असलेल्या विलासराव देशमुखांना आज तमाम देशवासियांनी अखेरचा निरोप दिला. ज्या बाभळगावातून त्यांची कारकिर्द सुरु झाली, त्याच बाभळगावात लाखोंच्या जनसमुदायानं साश्रू नयनांनी त्यांना अलविदा केला. विलासरावांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेतला आहे, बाभळगाव ते बाभळगावमध्ये.
केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना लाखोंच्या उपस्थितीत लातूर जिल्ह्यात त्यांच्या बाभळगाव या मूळ गावी अखेरचा निरोप देण्यात आला.. विलासरावांचं गारुड मराठवाड्यावर कशा प्रकारे होतं याची प्रचितीच यानिमित्तानं आली..पंतप्रधान, सोनियांसह दिग्गज नेते विलासरावांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते.
वेळ - पहाटे 5.30 वा
केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं पार्थिव चेन्नईहून लातूरच्या दिशेनं विमानानं रवाना झालं.

वेळ सकाळी 9.00 वा..
लातूर विमानतळावर लाखोंचा जनसमुदाय मराठवाड्याच्या या लाडक्या सुपुत्राच्या अखेरच्या दर्शनसाठी पहाटेपासूनच उपस्थित होता.. दिवसभरात अनेक दिग्गज नेते येणार असल्यानं विमानतळ परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली.
वेळ सकाळी 10 वाजता
विमानतळावरुन फुलांनी सजवलेल्या रथातून विलासरावांच्या पार्थिवाचा त्यांच्या बाभळगाव या मूळ गावी अखेरचा प्रवास सुरु झाला.. यावेळी रस्त्यावर दुतर्फा गर्दी होती.. लातूर शहरावर या लाडक्या नेत्याच्या मृत्यूनं मंगळवारपासूनच शोककळा पसरली होती..त्यामुळं विलासरावांचं पार्थिव बाभळगावला रवाना होताना, रस्त्यांवर असा हजारोंचा जनसुमदाय जमा होता.
वेळ सकाळी 11 वाजता
बाभळगावातील विलासरावांच्या वडिलोपार्जित गढीवर विलासरावांचं पार्थिव आणण्यात आंल.. यावेळी वैशालीताई, अमित, रितेश, धीरज यांच्यासह सा-यांच कुटुंबीयांना शोक अनावर झाला. बाभळगावातली देशमुखांची गढी पोरकी झाल्याचं दु:ख सा-यांच्याच चेह-यावर जाणवत होतं.. बाभळगावातील रहिवाशांनाही अश्रू अनावर झाले.

वेळ सकाळी 12 वाजता.
विलासरावांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी बाभळगावच्या दयानंद विद्यालयाच्या प्रांगणात ठेवण्यात आलं.. याच दयानंद विद्यालयातून विलासरावांनी शिक्षण घेतलं होतं.. यावेळी विलासरावांच्या अंत्यदर्शनासाठी अक्षरश लाखोंच्या जनसमुदायानं रीघ लावली.. केवळ लातूर जिल्ह्यातूनच नव्हे तर मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांतूनही नागरिकांनी इथं गर्दी केली होती.. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राज्यपाल शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह बॉलिवूड सेलिब्रटिंनीही अंत्यदर्शन घेत, देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलं.
वेळ दुपारी 2 वाजता
विलासरावांचं पार्थिव दयानंद महाविद्यालयातून पुन्हा त्यांच्या गढीवर नेण्यात आलं... यावेळी अक्षरश: लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
वेळ दुपारी 4 वाजता
विलासरावांचा अखेरचा प्रवास सुरु झाला.. लाखोंच्या उपस्थितीत बाभळगावातील वडिलोपार्जित आंब्याच्या शेतात त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले...यावेळी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजप अध्यक्ष नितीन गडकरी, भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासह राज्यातील दिग्गज नेदतेमंडळी आणि बॉलीवूड सेलिब्रिटीही उपस्थित होते.. जनसमुदायाच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली होती.. विलासरावांच्या आठवणी मनात होत्या..आणि मराठवाड्याचा हा उमदा नेता आता पुन्हा दिसणार नाही, हसणार नाही ही खंतही.. आपल्या हिकमतीने आणि लोकशाहीच्या बळावर बाभळगावातून सरपंचपदापासून केंद्रीय मंत्रिपदाला गवसणी घालणारे विलासराव अखेर अनंतात विलिन झाले.. बाभळगावातून जीवनाच्या प्रवासाची सुरुवात करणा-या विलासरावांची अखेर बाभळगावात अशी लाखो चाहत्यांच्या उपस्थितीत झाली.

विलासराव अनंतता विलिन झाले...पण आपल्या कर्तृत्वाची छाप मात्र महाराष्ट्राच्या राजकारणावर ते कायमचीच सोडून गेलेत..ते एक उत्तम प्रशासक आणि मुत्सद्दी राजकारणी होते.

विलासराव देशमुख.
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत राजकारणी. फर्डा वक्ता. हजरजवाबी... दिलखुलास व्यक्त