मुंबई किनाऱ्यावर संशयास्पद जहाज

मुंबईच्या समुद्र किना-यापासून अवघ्या २२ किलोमीटर अंतरावर समुद्रात एम. एस. व्ही . युसुफी हे जहाज होतं. एका फोन कॉलमुळेच ते जहाज नौदलाच्या हाती लागलं आणि त्यातील बकऱ्यांचं रहस्य समोर आलं.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 25, 2013, 10:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
मुंबईच्या किनाऱ्यावर बकरे, जहाज आणि गुढ!
सॅटेलाईट फोन आणि बक-यांमुळे वाढलं रहस्य !
बकऱ्याच्या पोटातील पावडरचे काय आहे गुढ ?

पोलिसांनी त्या जहाजातील बक-यांचा एक्स-रे काढला तेंव्हा काही बक-यांच्या पोटात प्लास्टिक पिशव्या असल्याचं आढळून आलं...पोलिसांनी तीन बकऱ्यांचं ऑपरेशन करुन त्या प्लॅस्टिक पिशव्या बाहेर काढल्या तेव्हा त्या पिशवीत काळसर पदार्थ आढळून आला..त्यामुळे हे प्रकरण आणखीच गुंतागुंतीचं झालंय...
या बक-या एमएसव्ही युसुफी या जहाजावरुन ताब्यात घेण्यात आल्या आहेत...त्यांच्या पोटात काळसर पदार्थ असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या आढळून आल्या आहेत... जहाजावर आढळून आलेल्या ३० बक-यांचा पोलिसांनी एक्स-रे काढला होता... त्यापैकी ५ बक-यांच्या पोटात प्लॅस्टिक पिशव्या असल्याचं निदर्शनास आलं होतं.
पोलिसांनी ३ बक-यांचं आपरेशन करुन ते प्लॅस्टिक पिशव्या हस्तगत केल्यात...बक-यांच्या पोटात आढलेला तो पदार्थ फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासासाठी पाठवण्यात आलाय.त्या पदार्थाचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणातील अनेक महत्वाच्या बाबींचा खुलासा होणार आहे.

बकऱ्यांचं रहस्य
मुंबईच्या समुद्र किना-यापासून अवघ्या २२ किलोमीटर अंतरावर समुद्रात एम. एस. व्ही . युसुफी हे जहाज होतं...त्या जहाजावरुन रात्री ११ वाजण्याच्या सुमारास एक फोन कॉल करण्यात आला...मात्र त्या फोन कॉलमुळेच ते जहाज नौदलाच्या हाती लागलं आणि त्यातील बकऱ्यांचं रहस्य समोर आलं.

मुंबईच्या कुलाबा परिसरातील एनटीआर केंद्राच्या अधिकाऱ्याचं लक्ष एका सॅटेलाईट मोबाईल फोनवरील संभाषणाने वेधून घेतलं. मुंबईपासून अवघ्या १२ नॉटीकल अंतरावर असलेल्या जहाजातून ती व्यक्ती सॅटेलाईट मोबाईल फोनवरुन बोलतं होती. त्यामुळे एनटीआर अधिका-यांचा संशय बळावला.एनटीआर तो फोन कॉल ट्रेस केला होता. त्यांनी तात्काळ गस्तीवर असलेल्या नौदलाच्या पथकाला सतर्क केलं.
नौदलाच्या पथकाने वेगाने कारवाई करत एमएसव्ही युसुफी या जहाजावरील चौघांना ताब्यात घेतलं...त्यांना जहाजावर ३० बक-या आढळुन आल्या तसेच जहाजावर असलेल्यांनी सॅटेलाईट फोनचा वापर केल्याचं पोलिसांनी सांगितलंय. नेवीची गस्त नौका एमएसवी युसुफी या जहाजाजवळ येईपर्यंत जहाजावरील ४ लोकांनी सॅटेलाईट फ़ोन, मेलेल्या बकर्या आणि बरच काही समुद्रात फेकलं, या बरच काहीमध्ये काय होतं हे नेवीच्या अधिकार्या्नी कळू शकलं नाहीए, त्यामुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं बनलय.
एमएसव्ही जहाजावरील ते चौघे सॅटेलाईट फोनवरुन कोणाच्या संपर्कात होते?त्यांनी सॅटेलाईट फोन का वापरला? त्यांनी या बक-या दुबईवरुन आणल्या होत्या. दुबईहून बकऱ्या आणण्यामागे त्यांचा नेमका उद्देश काय? , असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. कारण मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सॅटेलाईट फोनचा वापर केला होता. यापार्श्वभूमीवर मुंबईतील सागरी सुरक्षेचा अंदाज घेण्यासाठी तर ही रेकी केली गेली नाही ना ?की हा तस्करीचा प्रकार होता ? याचा अजून उलगडा झाला नाही. कारण जहाजावरील बक-यांच्या पोटात प्लॅस्टिक पिशवी आढळून आली आहे... त्या पिशवीत काळसर पदार्थ आढळून आला असून त्यामुळे या प्रकरणाचं गुढ आणखीणच वाढलंय.