अभिनेता चिन्मय उद्गीरकर अ़डकला विवाहबंधनात

अभिनेता चिन्मय उद्गीरकर आणि अभिनेत्री गिरीजा जोशी अडकले विवाहबंधनात.

Updated: Dec 27, 2015, 09:13 PM IST
अभिनेता चिन्मय उद्गीरकर अ़डकला विवाहबंधनात title=

मुंबई : नांदा सौख्यभरे या मालिकेतील अभिनेता चिन्मय उद्गीरकर आणि अभिनेत्री गिरीजा जोशी यांचा विवाह आज सायंकाळी ५ वाजता ठाणे येथे पार पडला. या विवाह सोहळ्याला चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनेक दिग्गजानी हजेरी लावली.

अभिनेत्री गिरीजा जोशीने दिग्दर्शित प्रियतमा या मराठी सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने देऊळ बंद, वाजलीच पाहिजे या चित्रपटांमध्येही काम केलं.

विराज राजे यांनी दिग्दर्शित केलेल्या वाजलीच पाहिजे या चित्रपटात चिन्मय उद्गीरकर आणि गिरीजा जोशी यांची मुख्य भूमिका होती. एकत्र काम करतांना त्यांच्यात मैत्री झाली आणि आज मैत्रीचे रुपांतर विवाहबंधनात झाले.