बांग्लादेशचे फॅन पराभवानंतर सोशल मीडियावर पिसाळले

भारतीय खेळाडूंना डिवचण्याचा प्रयत्न

Updated: Mar 7, 2016, 06:23 PM IST
बांग्लादेशचे फॅन पराभवानंतर सोशल मीडियावर पिसाळले title=

मुंबई : आशिया कपमध्ये भारत आणि बांग्लादेश या दोन टीम जेव्हा फायनलमध्ये भिडणार हे नक्की झालं तेव्हापासूनच क्रिकेट चाहत्यांमध्ये कुरापती सुरू झाल्या. बांग्लादेशमधील चाहत्यांनी पुन्हा एकदा भारताच्या खेळाडूंना डिवचण्याचा प्रयत्न केला. 

फोटोशॉपमध्ये धोनीचं मुंडकं हे बांग्लदेशचा कर्णधार मूर्तजाच्या हातात दाखवलं होतं त्यावरून चांगलाच वाद झाला. भारताने आशिया कप जिंकला तरी मात्र बांग्लादेशचे चाहत्यांचं विवादात्मक वक्तव्य सुरूच आहे. 

बांग्लादेशच्या एका चाहत्याने म्हटलं आहे की, 'कोहलीने मॅचमध्ये रब्बरच्या बॅटचा वापर केला. त्या रब्बरच्या बॅटला वरून लाकडाचं कवच होतं. त्यामुळे कोहली हा फक्त बॅट टच करताच बॉल बॉंड्रीच्या दिशेने जोरात जात होता.'