टी-२० वर्ल्डकप : सेमी फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका

टी-२० वर्ल्डकपच्या सेमी फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. युवराज सिंग याला टीम इंडियातून आऊट आलाय.

Updated: Mar 30, 2016, 03:40 PM IST
टी-२० वर्ल्डकप : सेमी फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका title=

मुंबई : टी-२० वर्ल्डकपच्या सेमी फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. युवराज सिंग याला टीम इंडियातून आऊट आलाय.

टी २० वर्ल्डकपच्या पुढील सामन्यासाठी दुखापतग्रस्त युवराज सिंगऐवजी मनीष पांडेचा टीम इंडियात समावेश करण्यात आलाय. हा टीम इंडियाला मोठा झटका आहे. सिक्सर किंग दुखापतीमुळे टी २० विश्वचषकाच्या बाहेर गेलाय.

युवीच्या जागी मनिष पांडेला संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना युवराजला दुखापत झाली होती. त्यामुळे युवीच्या जागेवर मनिषला संधी देण्यात आली आहे. मात्र, मुंबईच्या अजिंक्य रहाणेला संधी देण्यात न आल्याने क्रिकेटप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे.